AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या तिमाहीत अंबानींनी जिओत किती कमावलं? वाचा सविस्तर

रिलायन्स जिओला झालेल्या नफ्याबद्दल बोलायचं झालं तर तिसऱ्या तिमाहीमध्ये 3,489 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 3,020 कोटी रुपये होता.

गेल्या तिमाहीत अंबानींनी जिओत किती कमावलं? वाचा सविस्तर
Reliance oxygen supplies patients
| Edited By: | Updated on: Jan 23, 2021 | 8:12 AM
Share

नवी दिल्ली : देशातील सगळ्यात आघाडीची आणि प्रसिद्धी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये नफ्यात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाहीतर कंपनीची प्रत्येक क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स जिओला झालेल्या नफ्याबद्दल बोलायचं झालं तर तिसऱ्या तिमाहीमध्ये 3,489 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 3,020 कोटी रुपये होता. त्यामुळे तब्बल 15.5 टक्क्यांची नफ्यामध्ये वाढ झाल्याचं नोंदवलं गेलं आहे. रिलायन्सने आज त्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. (business news reliance jio profitability increased sharply in the third quarter)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स जिओचं आर्थिक परिणाम म्हणजे रिलायन्स जिओच्या शुद्ध नफ्याविषयी माहिती देण्यात आली आहे. हा निव्वळ नफा तिसऱ्या तिमाहीत 3,489 कोटींनी वाढला आहे. तिसर्‍या तिमाहीमध्ये रिलायन्स जिओला व्हॅल्यू एडिड सर्व्हिसेसकडून 22,858 रुपयांचा नफा झाला, तर दुसऱ्या तिमाहीत हाच नफा 21,708 रुपये झाला. म्हणजेच यामध्ये 5.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानुसार, तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओचा एकूण महसूल 19,475 कोटी रुपये होता. दुसर्‍या तिमाहीत हे उत्पन्न 18,496 रुपये होतं.

यामध्ये रिलायन्स जिओचा तिसर्‍या तिमाहीत एबिटडा 8,483 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत हा 7,971 कोटी रुपये होता. म्हणजेच यामध्ये 6.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तोच एबिटा मार्जिन तिसऱ्या तिमाहित वाढून 43.6 टक्के झाला आहे. जो दुसऱ्या तिमाहित 43.1 टक्के होता. एकूणच यामध्ये तब्बल 46 बेसिस प्वाईटने वाढ झाली आहे.

या सगळ्या वाढलेल्या आकड्यांमुळए रिलायन्सचा निव्वळ नफा वाढला असून तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा 12 टक्के फायदा झाला आहे. एकीकडे मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा 11,640 कोटी रुपये होता. तर दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 1,57,165 कोटी रुपयांवरून घसरून 1,28,450 कोटी रुपयांवर आलं आहे. (business news reliance jio profitability increased sharply in the third quarter)

संबंधित बातम्या – 

नांदेड परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल, शंभरीकडे वाटचाल, वाचा आजचे भाव !

दागिने बनवायचे असतील तर उशिर करू नका, सोन्या-चांदीचे भाव घसरले

अचानक पैशांची गरज आहे तर SBI करेल मदत, जाणून घ्या काय आहे खास योजना?

(business news reliance jio profitability increased sharply in the third quarter)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली