AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक; जीएसटीविरोधात 26 फेब्रुवारी रोजी चक्काजाम!

जीएसटीच्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारी रोजी रोजी व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. (cait announces Bharat band on 26 February against GST)

'व्यापाऱ्यांची 'भारत बंद'ची हाक; जीएसटीविरोधात 26 फेब्रुवारी रोजी चक्काजाम!
| Updated on: Feb 08, 2021 | 5:23 PM
Share

नागपूर: जीएसटीच्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारी रोजी रोजी व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. त्या दिवशी उद्योग-व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) ही बंदची हाक दिली असून या कायद्या विरोधात 26 फेब्रुवारी रोजी देशभरात चक्काजाम करण्याची घोषणाही केली आहे. या आंदोलनाला ट्रान्स्पोर्ट सेक्टरची सर्वात मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएननेही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या आंदोलनात प्रत्यक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे. (cait announces Bharat band on 26 February against GST)

नागपूरमध्ये आजपासून सीएआयटीचं (कॅट) तीन दिवसाचं राष्ट्रीय व्यापार संमेलन सुरू झालं आहे. या संमेलनात देशातील सर्व राज्यातील 200 हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आले आहेत. कॅटच्या अंतर्गत येणारे देशातील 8 कोटी व्यापारी आंदोलनाला पाठिंबा देतील. तसेच ऑल इंडिया टान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनही या आंदोलनात सहभागी होणार आहे.

जीएसटी फोल ठरलीय

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल तसेच ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी संयुक्तरित्या आज भारत बंदची घोषणा केली आहे. जीएसटी कौन्सिलने जीएसटीचं स्वरुप आपल्या फायद्यासाठी विकृत केल्याचा आरोप भरतीया आणि खंडेलवाल यांनी केला आहे. तसेच जीएसटी प्रणाली पूर्णपणे फोल ठरल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जीएसटीच्या मूळ गाभ्याशी छेडछाड

जीएसटीचे जे मूळ स्वरुप आहे. ते बदलण्यात आलं आहे. सर्वच राज्य आपल्या स्वार्थांसाठी अधित चिंतीत आहेत. त्यांना जीएसटी प्रणालीच्या सुसूत्रीकरणाशी काहीही घेणंदेणं उरलेलं नाही. देशातील व्यापारी व्यापार करण्यापेक्षा दिवसभर जीएसटी नियमांचं पालन करण्याच्या कामात व्यग्र असतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे जीएसटीचा आगामी काळात पुनर्विचार करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

937 वेळा दुरुस्त्या झाल्या

गेल्या चार वर्षात जीएसटीमध्ये 937 वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. इतक्यावेळा दुरुस्त्या केल्याने जीएसटीचा मूळ ढाचाच बदलून गेला आहे. अनेकदा कॅटने जीएसटीबाबत अनेक सूचना केल्या. पण त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. जीएसटी परिषद लक्षच देत नाही. त्यामुळेच आपलं म्हणणं देशातील जनतेसमोर मांडावं या करिता आम्ही भारत बंदची हाक दिली असून त्या दिवशी संपूर्ण उद्योग-धंदे बंद राहील अशी घोषणा कॅटने केली आहे. (cait announces Bharat band on 26 February against GST)

संबंधित बातम्या:

Good News! तब्बल 46,800 रुपयांपर्यंत टॅक्स वाचवा, ‘अशी’ आहे खास योजना

सरकारी कंपन्या विकण्यासाठी मोदींचा नवा प्लॅन; 6 कंपन्या होऊ शकतात बंद, कर्मचार्‍यांचे काय?

फक्त हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, कमी वेळात होईल डबल फायदा

(cait announces Bharat band on 26 February against GST)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली