तुमच्या खात्याला आजच बदला जनधन खात्यामध्ये, होईल लाखोंचा फायदा

तुमचेही बचत खातं असल्यास ते जनधन खात्यात ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. याची प्रक्रियादेखील अतिशय सोपी आहे.

तुमच्या खात्याला आजच बदला जनधन खात्यामध्ये, होईल लाखोंचा फायदा
महाराष्ट्रातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Mantha Urban Cooperative Bank) आणि लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) आरबीआयकडून (RBI) निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर बँक बुडाली तर त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशांचं काय होईल? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 6:39 PM

नवी दिल्ली : जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. इतकंच नाही तर हे उघडणंही सोपं आहे. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) मोदी सरकारने (Modi Government) तीन हप्त्यांमध्ये ग्राहकांच्या जनधन खात्यात (Jan Dhan Accounts) 1,500 रुपये टाकले होते. तुमचेही बचत खातं असल्यास ते जनधन खात्यात ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. याची प्रक्रियादेखील अतिशय सोपी आहे. पंतप्रधान जनधन योजने (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) मध्ये खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. पण जर तुम्हाला चेकबुकची सुविधा हवी असेल तर खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. (change your saving bank account to jan dhan account get benefits of lakhs)

जुन्या खात्याला असे बदला जनधन खाद्यामध्ये… जर एखाद्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ते तुम्ही जनधन खात्यात ट्रान्सफर करू शकता. याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जनधन योजनेत ट्रान्सफर होईल.

अशात तुम्हाला जर जनधन योजनेंतर्गत बँक खातं उघडायचं असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत उघडू शकता. खातं उघडण्यासाठी कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून भरावा लागेल. संबंधित कागदपत्रं जोडल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.

असा मिळेल लाखोंना फायदा जनधन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्डची सेवादेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डवर 1 लाख रुपये अपघात विमा मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ग्राहकांनी 28.8.2018 नंतर खातं उघडलं आहे त्यांचा अपघात विमा वाढवून 2 लाख करण्यात आला आहे. याशिवाय कार्डवर 30,000 रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण देण्यात आले आहे. (change your saving bank account to jan dhan account get benefits of lakhs)

जनधन खाते आधारशी करा लिंक सर्व खातेधारकांचा आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करून घेण्याच्या सूचना अर्थमंत्री (Minister) निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) यांनी बँकांना दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, ज्या खात्यांमध्ये पॅन नंबर (Pan card Number) आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर (aadhaar Card Number) महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक असला पाहिजे. इतकंच नाही तर 2.30 लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) वेळीच आपलं खातं उघडा आणि आधारशी लिंक करा असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं होतं.

इतर बातम्या –

जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा

SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना ‘Alert’ जारी

(change your saving bank account to jan dhan account get benefits of lakhs)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.