AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या उद्रेकामुळे शांघायच्या समुद्रात जहाजांची भाऊगर्दी! चीनमधील टाळेबंदीचा भारतावर काय परिणाम होईल?

चीनच्या शांघायमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे शेकडो जहाजं बंदराबाहेर खोळंबली आहेत. टाळेबंदीमुळे सामानाची आवकजावक थांबली आहे, त्यामुळे पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला आहे. शांघाय हे जगातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे.

कोरोनाच्या उद्रेकामुळे शांघायच्या समुद्रात जहाजांची भाऊगर्दी! चीनमधील टाळेबंदीचा भारतावर काय परिणाम होईल?
Shanghai PortImage Credit source: Lloyd's List
| Updated on: Apr 22, 2022 | 12:12 PM
Share

मुंबई : चीन (China) सध्या कोरोनाच्या (Corona) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फटक्याशी झुंज देत आहे. सर्वात वाईट परिस्थिती सध्या शांघायची (Shangai) आहे. कोरोनाच्या नव्या लाटेत इथे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 मार्चपासून येथे कडक टाळेबंदी (Lockdown) लागू करण्यात आली आहे. परिणामी लोकांना आता खाण्या-पिण्याच्या वस्तूंची कमतरता भासू लागली आहे. कडक लॉकडाऊनमुळे शांघाय बंदरात (Shanghai Port) हजारो कंटेनर जमा झाले आहेत. शांघायमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे शेकडो जहाजं बंदराबाहेर खोळंबली आहेत. टाळेबंदीमुळे सामानाची आवकजावक थांबली आहे, त्यामुळे पुरवठा साखळीवर (Supply Chain) विपरीत परिणाम झाला आहे. शांघाय हे जगातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे. येथे दरवर्षी सुमारे 4 ते 5 कोटी कंटेनर हाताळले जातात. मात्र आता लॉकडाऊनमुळे नवे संकट ओढावले आहे. त्याचा विपरीत परिणाम चीनवर दिसू लागला आहे.

शांघाय हे चीनचे आर्थिक केंद्र आहे आणि जगातील सर्वात व्यस्त बंदर ही आहे. कडक लॉकडाऊनमुळे शांघाय बंदरात शेकडो जहाजांनी नांगर टाकले आहेत. शांघाय बंदरातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, ज्यामुळे माल उतरवणे आणि चढवणे जिकिरीचे काम झाले आहे. याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे. माल पोहोचण्यासाठी विलंब झाला तर महागाई वाढण्याचाही धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अहवालानुसार, चीनच्या शांघाय बंदराबाहेर 500 हून अधिक जहाजं अडकली आहेत. या जहाजांमध्ये ठेवलेले कंटेनर उतरवायलाही वेळ लागत आहे. बंदरातील कामे बंद नाहीत, मात्र कर्मचारी नसल्याने माल उतरत नाही आणि माल उतरला तरी त्याची वाहतूक करण्यासाठी ट्रकचालकच नाहीत. एवढे सगळे होऊनही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग लॉकडाऊनमध्ये किंचितही शिथिलता देण्यास तयार नाहीत.

चीनमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंची कमतरता

शांघाय बंदर हे जगातील सर्वात व्यस्त बंदर आहे. येथे दरवर्षी सुमारे 4 ते 5 कोटी कंटेनर हाताळले जातात. मात्र आता लॉकडाऊनमुळे नवे संकट ओढावले आहे. त्याचा परिणाम चीनवर दिसू लागला आहे. येथील लोकांसाठी खाण्या-पिण्याची कमतरता आहे. सुपरमार्केटमधील शिधा संपत चालला आहे. आवश्यक कच्चा माल मिळत नसल्याने कंपन्यांनी उत्पादनही बंद केले आहे. टेस्लाने 28 मार्च रोजी आपल्या शांघाय कारखान्यातील काम थांबवले आहे.

भारताचा चीनसोबत मोठा व्यवसाय

अमेरिकेनंतर भारत आपला सर्वाधिक व्यवसाय चीनबरोबर करतो. एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत भारत-चीनमध्ये 7.80 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला. त्यापैकी 6.33 लाख कोटींच्या मालाची आयात करण्यात आली असून 1.47 लाख कोटींची निर्यात झाली आहे. 2020-21 मध्ये भारत आणि चीन यांच्यात 6.40 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

फार्मा उद्योग : शांघाय बंदराबाहेरील समुद्रात होणाऱ्या कोंडीचा परिणाम भारताच्या फार्मा उद्योगावरही होऊ शकतो. औषधांच्या कच्च्या मालासाठी भारत चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारने दिलेल्या उत्तरानुसार भारत चीनमधून 68% पेक्षा जास्त API (औषधांसाठी कच्चा माल) आयात करतो. एका वर्षात भारताने चीनकडून 1,464 कोटी रुपयांच्या एपीआयची आयात केली आहे.

इतर बातम्या

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत

Big News: देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न! लाल दिवा दाखवून रेल्वेवर दगडफेक;महिलेचे दागिने लंपास

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.