AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत

कोरोनाची (Corona) तिसरी लाट (Third Wave) ओसरली असे वाटत असताना कोवीडच्या विषाणूची वळवळ पुन्हा सुरू झाली आहे. चीनमधून आलेल्या कोविडच्या विषाणूने पुन्हा एकदा चीनमध्ये थैमान घालायला सुरूवात केली आहे. रोज 20 हजाराहून अधिक रूग्ण दाखल होत आहेत. चीनच्या 44 शहरात कडक लॅाकडाऊन लावण्यात आले आहेत.

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत
शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेतImage Credit source: twitter
| Updated on: Apr 22, 2022 | 7:31 AM
Share

मुंबई – कोरोनाची (Corona) तिसरी लाट (Third Wave) ओसरली असे वाटत असताना कोवीडच्या विषाणूची वळवळ पुन्हा सुरू झाली आहे. चीनमधून आलेल्या कोविडच्या विषाणूने पुन्हा एकदा चीनमध्ये थैमान घालायला सुरूवात केली आहे. रोज 20 हजाराहून अधिक रूग्ण दाखल होत आहेत. चीनच्या 44 शहरात कडक लॅाकडाऊन लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटांनी आपल्याला आगोदरचं खूप पोळले आहे. देशवासीयांनी खूप हाल सोसले आहेत. त्यामुळे चौथी लाट दारात रोखायची असल्यास ताकही फुंकूनच प्यावे लागेल. कोरोणाच्या चौथ्या लाटेला आळा घालायचा असेल तर मास्कचा वापर अनिवार्य करणे हाचं पहिला पर्याय असू शकतो असं आजच्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखात म्हटलं आहे.

मागच्या चार दिवसात रूग्णसंख्या झपाट्याने वाढली

मागच्या चार दिवसांपासून भारत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरूवात झाली आहे. दोन हजाराने रूग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा धास्तावल्याचं चित्र आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रूग्णांचा आकडा दोन हजारांच्या पलीकडे गेला आहे. काल दिवसभरात कोरोनाची चाचणी केली असता दोन हजार तीनशे ऐंशी रूग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती मिळाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत युपी आणि दिल्लीत कोरोना बाधीत रूग्णांची संख्या अधिक आहे.

चौथ्या लाटेने आता दारावर धडक दिली आहे

सध्या कोरोना रूग्णांची होणारी वाढ ही केंद्र सरकार आणि देशातील राज्यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांच्या मृत्यूचं प्रमाण अत्यल्प होतं. पण पहिल्या दोन लाटेत देशाचं अर्थिक गणित बिघडवून टाकलं. सध्या कुठेतरी लोकांना आशेचा किरण दिसत होता. परंतु चौथ्या लाटेने आता दारावर धडक दिली आहे. केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्रं पाठवून त्यांना कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मिरोझम या राज्यांचा समावेश आहे. मधल्या काळात कोरोनाना आटोक्यात आल्याची चिन्हं दिसत होती. परंतु कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वरती काढल्याने अनेक राज्यांसाठी पुन्हा डोकेदुखी ठरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Big News: देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न! रेल्वे डब्यांवर तुफान दगडफेक झाल्यानं खळबळ

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

Video: कोकणात गारांचा पाऊस! आजही तळकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.