EPFO Investment | ETF मधील गुंतवणुकीतून ईपीएफओ मालामाल, आकडे पाहताच तुम्ही म्हणाल मान गये उस्ताद!

EPFO Investment | ETF मधील गुंतवणुकीतून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मालामाल झाली आहे. ईपीएफओने केलेली कमाई पाहून तुम्ही ही म्हणाला वा भाई वा, काय कमाल केली.

EPFO Investment | ETF मधील गुंतवणुकीतून ईपीएफओ मालामाल, आकडे पाहताच तुम्ही म्हणाल मान गये उस्ताद!
ईपीएफओ मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 4:43 PM

EPFO Investment | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) केवळ कर्मचाऱ्यांचे योगदान जमा करुन त्यावर व्याज देण्याचेच काम करत नाही. तर संघटना गुंतवणूक ही करते. ईपीएफओ वेगवेगळ्या माध्यमांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून (Investment) उत्पन्न मिळवते. त्यातून संघटना दरवर्षी आपल्या सदस्यांना परतावा देते. गेल्या काही वर्षांत शेअर बाजार, विशेषत: एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हे ‘ईपीएफओ’चे पसंतीचे माध्यम म्हणून पुढे आले आहे. सरकारने या संदर्भातील ताजी आकडेवारी संसदेत (Parliament) सादर केली आहे. त्यातून ही बाब उघड झाली आहे. ईपीएफओने ऑगस्ट 2015 पासून ईटीएफमध्ये पैसे गुंतविण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ईपीएफओने ईटीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा आपल्या एकूण गुंतवणूकक्षम ठेवींच्या 5 टक्के इतकी निश्चित केली होती. पुढे ईपीएफओने 2016-17 मध्ये ही मर्यादा 10 टक्क्यांपर्यंत वाढवली. आता संघटनेने ईटीएफमध्ये 15 टक्के गुंतवणूक केली आहे.

ईटीएफमधील गुंतवणुकीवरील हा परतावा

ईपीएफओने यावर्षी मार्चपर्यंत ईटीएफमध्ये 1,59,299.46 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सोमवारी संसदेत दिली. ईपीएफओच्या ईटीएफमधील या गुंतवणुकीचे काल्पनिक बाजारमूल्य वाढून 2,26,919.18 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच ईपीएफओला ईटीएफकडून 42.44 टक्के परतावा मिळाला असून आतापर्यंत 67,619.72 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

हे सुद्धा वाचा

2015 मध्ये सुरू झाली ईटीएफमध्ये गुंतवणूक

ईपीएफओने ऑगस्ट 2015 पासून ईटीएफमध्ये पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ईपीएफओने ईटीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा आपल्या एकूण गुंतवणूकक्षम ठेवींच्या 5 टक्के इतकी निश्चित केली होती. त्यानंतर ईपीएफओने 2016-17 मध्ये ही मर्यादा 10 टक्क्यांपर्यंत वाढवली. यानंतर 2017-18 मध्ये ही मर्यादा पुन्हा वाढवून 15 टक्के करण्यात आली.

एप्रिल-जून दरम्यान इतके पैसे गुंतवले

लोकसभेत मंत्री रामेश्वर तेली यांनी याविषयीच्या एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत ईपीएफओने ईटीएफमध्ये 12,199.26 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी या काळात ‘ईपीएफओ’ची डेट आणि इक्विटीमध्ये एकूण गुंतवणूक 84,477.67 कोटी रुपये होती. ईपीएफओने 2021-22 मध्ये ईटीएफमध्ये 43,568.02 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 32,070.84 कोटी रुपये आणि 2019-20 मध्ये 31,501,09 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहरे.

ईपीएफओची गुंतवणूक

ईपीएफओने ऑगस्ट 2015 ते मार्च 2022 या कालावधीत ईटीएफमध्ये एकूण 1,59,299.46 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, जी आता वाढून 2,26,919.18 कोटी रुपये झाली आहे. सध्या ईपीएफओ आपल्या गुंतवणुकीयोग्य निधीपैकी 85 टक्के रक्कम डेटमध्ये गुंतवते, तर उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवत आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, ईपीएफओची ईटीएफमधील गुंतवणूक निफ्टी 50, बीएसई सेन्सेक्स, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइझ मध्ये करत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.