AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Mines : सापडले घबाड! KGF पेक्षा जास्त सोनं निघणार, ही राज्य मालामाल होणार

Gold Mines : देशातील या पाच राज्यांत सोन्याचे घबाड सापडले आहे. येथे सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. त्यामुळे ही राज्य तर श्रीमंत होणारच आहे. पण देशाला पण त्याचा मोठा फायदा होणार आहे. देशातील सोन्याची आयात कमी होऊ शकते.

Gold Mines : सापडले घबाड! KGF पेक्षा जास्त सोनं निघणार, ही राज्य मालामाल होणार
| Updated on: Mar 30, 2023 | 10:04 AM
Share

नवी दिल्ली : देशातील या पाच राज्यांत सोन्याचे घबाड सापडले आहे. येथे सोन्याच्या खाणी (Gold Mines) सापडल्या आहेत. त्यामुळे ही राज्य तर श्रीमंत होणारच आहे. पण देशाला पण त्याचा मोठा फायदा होणार आहे. देशातील सोन्याची आयात कमी होऊ शकते. केंद्र सरकारने लोकसभेत (Loksabha) याविषयीची माहिती दिली. सोन्याचे भंडार सापडल्याने सोन्याच्या भावातही फरक येऊ शकतो. या खाणीतून मोठ्या प्रमाणावर सोने गवसल्यास भारताला मोठा फायदा होईल. भारतात काही महिन्यांपूर्वी एक्सचेंज बुलियन (Exchange Bullion) सुरु झाले आहे. त्यामुळे देशभर सोन्याचा एकच भाव असेल. त्यात देशात सोने सापडल्याने आयातीवरचा भर कमी होईल.

या राज्यात सापडला खजिना

केंद्र सरकारने लोकसभेत याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड या पाच राज्यात हे घबाड सापडले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत, मॅपिंग केल्यानंतर सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. अजूनही काही ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. त्यात जर यश मिळाले तर भविष्यातील चित्र वेगळे असू शकते.

देशातील 7 राज्यात खजिना

आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ आणि राजस्थानमध्ये यापूर्वी पण सोने सापडले आहे. याठिकाणी शोध मोहिम सुरुच आहेत. देशात एकूण सात राज्यात सोने सातत्याने सापडत आले आहे. आता आणखी 18 ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.

आंध्र प्रदेश नव्हे सोने प्रदेश

आंध्र प्रदेशात सर्वाधिक सोन्याचा खजिना सापडला आहे. रामगिरी नॉर्थ ब्लॉक, बोक्समल्ली नॉर्थ ब्लॉक, बोक्समपल्ली साउथ ब्लॉक, जवाकुला-ए ब्लॉक, जवाकुला-बी ब्लॉक, जवाकुला-सी ब्लॉक, जवाकुला-डी ब्लॉक, जवाकुला-ई ब्लॉक, जवाकुला-एफ ब्लॉक याठिकाणी सोने सापडले आहे. उत्तर प्रदेशातील तीन पैकी दोन सोन्याच्या खाणी सोनभद्र येथे आहेत. या तीन खाणीसाठी गेल्यावर्षी 21 मे रोजी निविदा काढण्यात आली होती.

सध्या भारतात सोन्याच्या तीन ठिकाणी खाणी आहेत. यापैकी कर्नाटकातील हुट्टी आणि उटी येथे सोन्याच्या खाणी आहेत. तर झारखंडमध्ये हिराबुद्दीन परिसरात सोन्याची खाण आहे. भारताचे सोन्याचे उत्पादन जवळपास 1.6 टन आहे. तर वार्षिक वापर 774 टन इतका आहे. उत्पादनाच्या अनेक पट्टीत आयात होते आणि वापर होतो.

देशात सोन्याची मागणी सातत्याने वाढत असल्याने केंद्र सरकार देशातच सोन्याचे उत्पादन वाढविण्यावर भर देत आहे. त्यासाठी गेल्यावर्षी निती आयोगाने पावले टाकली आहेत. त्यासाठी देशात अनेक ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात आले. खनिज मंत्रालयाने याविषयीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार, भारताचे एकूण सोने भांडार 70.1 टन (4.1 जी/टन वर 17.2 एमटी) आहे. देशात सर्वाधिक सोने दक्षिण भारतात आहे. कर्नाटक राज्यातच 88 टक्के सोने साठा आहे.

सोन्याचे या ठिकाणी भंडार

  1. महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे भंडार सापडले आहे.
  2. तर मध्य प्रदेशातील सीधी आणि कटनी जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.
  3. झारखंडमधील सिंहभूम आणि रांची जिल्ह्यात सोन्याचा खजिना गवसला आहे.
  4. कर्नाटकमधील तुमकुर, धारवाड, हवेरी, दावनगेरे, चित्रदुर्ग, रायचूरमध्ये सोने सापडले
  5. राजस्थानमधील बांसवाडा आणि अलवर मध्ये सोन्याच्या खाणी मिळाल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.