AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grain Stock : देशात पहिल्यांदाच धान्याचा तुटवडा ? बंपर स्टॉक झरझर घसरला, कारण तरी काय..

Grain Stock : देशात पहिल्यांदाच धान्याचा तुटवडा आला आहे, त्यामागील कारणं काय आहेत..?

Grain Stock : देशात पहिल्यांदाच धान्याचा तुटवडा ? बंपर स्टॉक झरझर घसरला, कारण तरी काय..
धान्यसाठा झाला कमी Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 14, 2022 | 4:57 PM
Share

नवी दिल्ली : देशात पाच वर्षांत पहिल्यांदाच अन्नधान्याचा साठा (Grain Stock) निच्चांकीस्तरावर (Lower Level) आला आहे. हा साठा 800 दशलक्ष लोकांना सबसिडीच्या (Subsidy) रुपात वापरता येणार होता. हा बंपर अन्नधान्य साठा अचानक कमी का झाला? यामागची कारणे केंद्र सरकारने (Central Government) शोधली आहे.

देशातील अनेक भागात पावसाने रौद्र रुप धारण केलेले आहे. उशीरा आगमन झालेला पाऊस अजूनही जायचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे शेतकरीच काय सरकारही हवालदिल झालेले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बेमोसमी पावसाने हाहाकार उडविला आहे. शेतातील पिकचं हातची गेली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गहू आणि तांदळाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यानंतर कडधान्य आणि डाळींचे नुकसान झाले आहे. या सर्वांचा परिणाम किरकोळ खाद्यान्न किंमती वाढल्या आहेत. या किंमती 22 महिन्यांच्या उच्चत्तम पातळीवर आहेत.

भारतीय अन्नधान्य महामंडळानुसार (FCI) या 1 ऑक्टोबर रोजी एकूण अन्नधान्य साठा 51.14 मिलियन टन होता. त्यात अनिवार्य बफर स्टॉक 30.77 मिलियन टन या आरक्षित भंडारपेक्षा 66% अधिक आहे. सरकार हा साठा या वर्षाकरिता राखीव ठेवणार आहे.

सध्या तांदळाचे उत्पादन देशाची गरज भागविण्यापूरते पुरेसे आहे. पण खरी चिंता गव्हाच्या साठ्याची आहे. कारण हा साठा गेल्या 14 वर्षांत सर्वात खालच्या स्तरावर पोहचला आहे. सरकारने निर्धारीत केलेल्या उद्दिष्टापेक्षा सरकार अर्ध्याच गव्हाची खरेदी करु शकले आहे.

मागणी वाढल्याने शेतकरी सरकारऐवजी खासगी व्यापाऱ्यांना गव्हाची विक्री करत आहेत. मार्च ते जूनपर्यंत यंदा कडक उन्हाळ्याच्या झळा जाणवल्याने गव्हाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे गव्हाचे उत्पादन कमालीचे घसरले.

तांदळाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी तादंळाच्या निर्यातीवर 20% शुल्क लावले आहे. त्यातून बासमती तांदळाला सवलत देण्यात आली आहे. तरीही खासगी व्यापारी अन्नधान्याचा काळाबाजार करुन अथवा साठेबाजी करुन जनतेला वेठीस धरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Follow Us
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...