AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food Price : अवकाळी पाऊस गणित बिघडवणार? तुमच्या ताटातील पदार्थ महागणार का?

Food Price : अवकाळी पावसाने सर्वांचीच गणिते बिघडवली आहेत. त्याचा फटका तुम्हाला बसणार का?

Food Price : अवकाळी पाऊस गणित बिघडवणार? तुमच्या ताटातील पदार्थ महागणार का?
Heavy RainImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 11, 2022 | 10:21 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) संकटातून जगासह भारत कसाबसा बाहेर पडला. भारताने झपाट्याने गती पकडली आहे. पण या गतीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. नैसर्गिक संकटं एकामागून एक येत आहेत. त्यामुळे शेतीचे (Farming) अपरिमीत नुकसान (Rain Damage) होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना लवकरच बसण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात बेमौसमी पावसाने अनेक राज्यात थैमान घातले आहे. यंदा पावसाचा मुक्काम लांबलाच नाही तर धुवाधार पावसाने शेतीचे आणि पिकांचं मोठं नुकसान केले आहे. शेतात गुडघा गुडघा पाणी तुंबलं आहे. पाण्याचा निचारा न झाल्याने जमीन चिभडली आहे. पीके जळून गेली आहे. अति पावसाने हातचे पीकही गेले आहे.

काही राज्यात पीक हातातोंडाशी आले होते. यंदा पाऊस दमदार झाला. त्यामुळे पीके जोमाने आली होती. तर गव्हाचे उत्पादन यंदा कमी होणार असल्याने गव्हाची निर्यात थांबविण्यात आली आहे. दरम्यान इतर पीकांचे उत्पादन चांगले होईल असा अंदाज होता. परंतु पावसाने या अंदाजावर पाणी फेरले.

ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसांत दिल्लीत नेहमीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. अशीच परिस्थिती उत्तर प्रदेश राज्याचीही आहे. हरियाणा राज्यात सरासरीपेक्षा 7 पट अधिक पाऊस झाला आहे. राजस्थान 5 पट, मध्यप्रदेशात 3 पट जास्त पाऊस झाला आहे. तर संपूर्ण देशात सरासरीपेक्षा 67 टक्के अधिक पाऊस पडला आहे.

या दिवसात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पीकाची कापणी करताच आली नाही. अवकाळी पावसाने शेतात पीके उभीच राहिली. काही ठिकाणी सोयाबीन शेतात झोपल्यामुळे पुन्हा अंकुर फुटले आहेत. तर काही ठिकाणी पीके जोरदार पावसाने वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे उत्पादन घसरले आहे. कमी उत्पादनामुळे अन्नधान्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. या तुटवड्यामुळे येत्या काही दिवसात अन्नधान्याचे भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....