AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्चे तेल प्रति बॅरल 118 डॉलरवर; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतींवर झाला असून, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आज गुरुवारी कच्च्या तेलाचे दर जवळपास प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले आहेत.

कच्चे तेल प्रति बॅरल 118 डॉलरवर; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे भाव
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 10:55 AM
Share

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतींवर झाला असून, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आज गुरुवारी कच्च्या तेलाचे दर जवळपास प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. एकीकडे आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. मात्र दुसरीकडे भारतात अद्यापही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास इंधनाच्या दरात वाढ होते. मात्र भारतात गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज देखील त्याच्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109. 98 रुपये तर डिझेल 84. 24 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91.43 रुपये लिटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 रुपये एवढे असून, डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढू शकतात.

देशात चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर

देशात गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने चार नोव्हेंबर 2021 ला पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर गगणाला भिडले आहेत, मात्र भारतात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. मात्र येत्या दहा मार्चला पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत, त्यानंतर दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Ukraine Russia war: सोने हजार रुपयांनी महागले, चांदीच्या दरातही वाढ

आणखी एका सहकारी बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, बँकेचा परवाना रद्द; चेक करा तुमचे खाते तर ‘या’ बँकेत नाहीना?

दिलासादायक! फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढली, 22 टक्क्यांच्या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.