AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणामुळे समुद्रातून तेल काढणे जमिनीपेक्षा खूप महाग आहे, वाचा सविस्तर!

जमिनीतून तेल काढणे जास्त स्वस्त की समुद्रातून, याबाबत अनेकांना शंका असते. तेल काढण्याच्या या दोन्ही पद्धतींमध्ये खर्च आणि तंत्रज्ञानाचा मोठा फरक आहे. चला तर मग, या दोन्ही पद्धतींमध्ये कशात जास्त पैसा वाचतो, हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

'या' कारणामुळे समुद्रातून तेल काढणे जमिनीपेक्षा खूप महाग आहे, वाचा सविस्तर!
Onshore or Offshore
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Aug 04, 2025 | 9:42 PM
Share

आजच्या जगात तेल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक देशांकडे तेलाचा मोठा साठा आहे, पण प्रश्न असा पडतो की जमिनीतून तेल काढणे जास्त सोपे आणि स्वस्त असते की समुद्रातून? चला, या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे जाणून घेऊया आणि दोन्ही पद्धतींमधील खर्चाचा नेमका फरक समजून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक बाजू स्पष्ट होईल.

जमीन की समुद्र: कुठे जास्त खर्च येतो?

तेल काढण्याच्या प्रक्रियेला ‘ड्रिलिंग’ म्हणतात. जमिनीवरून तेल काढण्याला ऑनशोर ड्रिलिंग (Onshore Drilling) म्हणतात, तर समुद्रातून तेल काढण्याला ऑफशोर ड्रिलिंग ( Offshore Drilling ) म्हणतात. या दोन्ही प्रक्रियांमध्ये खर्चाचा मोठा फरक आहे.

ऑनशोर ड्रिलिंग ( जमिनीवरून ): जमिनीवरून तेल काढणे हे तुलनेने स्वस्त असते. कारण यासाठी लागणारे उपकरणे आणि पायाभूत सुविधा ( infrastructure ) सहज उपलब्ध असतात.

ऑफशोर ड्रिलिंग ( समुद्रातून ): समुद्रातून तेल काढणे हे खूप महाग असते. कारण यासाठी खास जहाजे, मोठे प्लॅटफॉर्म आणि खोल समुद्रात काम करण्याची आधुनिक तंत्रज्ञान लागते.

या खर्चाचा अंदाज तुम्ही असा लावू शकता की, जिथे एका ऑनशोर विहिरीसाठी 4 दशलक्ष डॉलर (सुमारे 33 कोटी रुपये) खर्च येतो, तिथे एका ऑफशोर विहिरीसाठी 100 दशलक्ष डॉलर ( सुमारे 830 कोटी रुपये ) खर्च येतो.

समुद्रातून तेल काढणे इतके महाग का आहे?

जमिनीवर ड्रिलिंग साइट्सपर्यंत पोहोचणे सोपे असते, पण समुद्रात तसे नसते. समुद्रातील हवामान, लाटा आणि तांत्रिक आव्हानांमुळे खर्च खूप वाढतो. तसेच, समुद्रात काम करण्यासाठी सुरक्षिततेचे अधिक कठोर नियम पाळावे लागतात, ज्यामुळे खर्च आणखी वाढतो.

जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा कोणाकडे?

1. व्हेनेझुएला: जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलाकडे आहे, सुमारे 303 अब्ज बॅरल.

2. सौदी अरब: दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरब आहे, ज्यांच्याकडे 267 अब्ज बॅरल तेल आहे.

3. इराण: इराण तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांच्याकडे 209 अब्ज बॅरल साठा आहे.

याशिवाय कॅनडा, इराक, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, रशिया आणि अमेरिकेकडेही मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा आहे.

भारताची स्थिती काय आहे?

भारताकडे तेलाचा साठा असूनही, आपली गरज खूप जास्त आहे. अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. भारत आपल्या एकूण गरजेपैकी सुमारे 85 टक्के तेल आयात करतो. यामुळे, आपल्याला परदेशी बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागते.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा