AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत इस्त्रायलला कर्ज देतो का? किती आहे भारताचं इस्त्रायलवर कर्ज?

इस्त्रायल हे भारताचं मित्र राष्ट्र आहे. दोन्ही देश एकमेकांचे प्रमुख आर्थिक भागिदार देश आहेत. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की भारत इस्त्रायलला नेमकं किती कर्ज देतो?

भारत इस्त्रायलला कर्ज देतो का? किती आहे भारताचं इस्त्रायलवर कर्ज?
Binyamin Netanyahu, Narendra ModiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 6:46 PM
Share

इस्त्रायल हा भारताचा मित्र देश आहे. इस्त्रायल आणि भारताची मैत्री ही केवळ कुटनीती स्थरावरच मर्यादित नाहीये, तर तिचं रूपांतर आता एका मोठ्या आर्थिक भागीदारीमध्ये झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचा दौरा केला होता. इस्त्रायलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान भारत कोणाला कोणाला कर्ज देतो? आर्थिक मदत करतो? असा प्रश्न येतो तेव्हा सर्वात आधी भारताच्या शेजारील देशांची नावं पुढे येतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? भारत इस्त्रायलला कर्ज देतो का? आणि देत असेल तर भारताचं इस्त्रायलवर किती कर्ज आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

भारत इस्त्रायलला कर्ज देतो का?

सामान्यपणे भारत हा आपल्या शेजारचे देश जसं की श्रीलंका, नेपाळ या सारख्या गरीब देशांना कर्ज देतो. भारताचं सर्वसामान्यपणे असं धोरण आहे की, जे अविकसीत देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत, त्यांना कर्ज दिलं जातं. परंतु इस्त्रायलसंदर्भात भारताचं धोरण हे थोडं वेगळे आहे, कारण इस्त्रायल हा विकसीत अर्थव्यवस्था असलेल्या (OECD) सदस्य आहे. त्यामुळे इस्त्रायलला भारताच्या कर्जाची गरज पडत नाही. त्यामुळे भारत देखील इस्त्रालयला कर्ज देत नाही.

मात्र दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध हे मजबूत आहेत. भारत इस्त्रायलला थेट कर्ज देत नाही. मात्र भारतीय कंपन्यांनी इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. 2000 पासून ते 2025 पर्यंत भारतीय कंपन्यांनी इस्त्रालयमध्ये तब्बल 443 मिलियन डॉलरची थेट गुंतवणूक केली आहे. भारताच्या अदानी ग्रुपची इस्त्रायलमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. एका रिपोर्टनुसार अदानी ग्रुपने इस्त्रायलचं फाइफा पोर्ट खरेदी करण्यासाठी तब्बल 1.18 बिलियन डॉलर जवळपास 9800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2023 मधील ही इस्त्रायलमधली सर्वात मोठी गुंतवणूक मानली जाते. मात्र सध्या इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असल्यानं तेथील वातावरण अस्थिर बनलं आहे.

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?