AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC चा मोठा निर्णय! आता देशातल्या कुठल्याही शाखेमध्ये देऊ शकता ‘हे’ महत्त्वाचं कागदपत्रं

कोरोनाच्या या भीषण संकटामुळे प्रवास करणं धोक्याचं आहे. अशात आता जवळच्या कुठल्याही शाखेमध्ये कागदपत्रं देता येणार असल्यामुळे ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

LIC चा मोठा निर्णय! आता देशातल्या कुठल्याही शाखेमध्ये देऊ शकता 'हे' महत्त्वाचं कागदपत्रं
केवळ 10320 रुपयांच्या प्रीमियमवर मिळेल 2 लाखांचे हमी रिटर्न्स
| Edited By: | Updated on: Mar 19, 2021 | 3:05 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (Life Insurance Corporation) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक देशातील कोणत्याही एलआयसी शाखेत एलआयसी पॉलिसी मॅच्युरिटी क्लेम पेमेंटसाठी (LIC policy maturity claim)कागदपत्रे सादर करु शकतात. खरंतर, कोरोनाच्या या भीषण संकटामुळे प्रवास करणं धोक्याचं आहे. अशात आता जवळच्या कुठल्याही शाखेमध्ये कागदपत्रं देता येणार असल्यामुळे ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. (lic news policyholders to deposit claims at any office till march end)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेत कागदपत्रं जमा केली तरी मॅच्युरिटी क्लेमवर फक्त मूळ शाखेतून प्रक्रिया केली जाईल. एलआयसीने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. एलआयसीने म्हटले आहे की, पॉलिसीधारक महिन्याच्या अखेरीस देशातील जवळच्या कोणत्याही एलआयसी कार्यालयात (LIC Office) पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा दावा करण्यासाठी कागदपत्रे सादर करु शकतात. एलआयसीच्या या घोषणेनंतर ज्या पॉलिसीधारकांचे धोरण परिपक्व झाले आहे अशा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळेल.

2 हजाराहून अधिक शाखा

एलआयसीची देशभरात 113 विभागीय कार्यालये, 2,048 शाखा आणि 1,526 छोटी कार्यालये आहेत. याशिवाय यामध्ये 74 ग्राहक झोन आहेत. जिथे त्यांच्या पॉलिसीचे मॅच्युरिटी क्लेम फॉर्म पॉलिसीधारकांकडून स्वीकारले जातील. कोणत्याही शाखेतून घेतलेल्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर ग्राहक क्लेम फॉर्म कुठेही सबमिट करू शकतील.

एलआयसीचे म्हणणे आहे की, ही सुविधा चाचणी म्हणून सुरू केली गेली आहे आणि त्वरित अंमलात आली आहे. ही सुविधा 31 मार्च रोजी कालबाह्य होत आहे. दरम्यान, एलआयसीमध्ये सध्या 29 कोटींपेक्षा जास्त पॉलिसीधारक आहेत. विमा व्यवसायात एलआयसी ही प्रथम क्रमांकावर विश्वासार्ह कंपनी आहे. लोकांना विश्वास आहे की, एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेले त्यांचे पैसे कधीही गमावणार नाहीत.

एलआयसी ही फक्त एक विश्वासार्ह विमा कंपनी नाही तर सर्वसामान्यांसाठी रोजगाराचा पर्यायदेखील आहे. अलीकडेच कंपनीने आपले नवीन पॉलिसी बचत प्लस बाजारात आणले. यात सुरक्षेसह बचत करण्याचीही सुविधा आहे. या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी पाच वर्षांचा आहे. (lic news policyholders to deposit claims at any office till march end)

संबंधित बातम्या – 

Gold Price Today : आज पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, पटापट चेक करा ताजे दर

सोन्याचे जुने दागिने अगदी नव्यासारखे चमकतील, फक्त करा एक काम

1 वर्षात FD वर मिळणार 6 टक्के जास्त फायदा, 31 मार्चपर्यंत पैसा होईल डबल

(lic news policyholders to deposit claims at any office till march end)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.