AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: मुंबईतील AI इंजिनिअरची नोकरी सोडली आणि शेतीची वाट धरली, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

28 वर्षीय पुष्पक साहूने फुलांची शेती सुरू करण्यासाठी AIची नोकरी सोडली. त्याचा हा निर्णय आज चर्चेचा विषय बनला असला तरीही त्याचा हा एक निर्णय अतिशय योग्य ठरला आहे.

Success Story: मुंबईतील AI इंजिनिअरची नोकरी सोडली आणि शेतीची वाट धरली, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये
orchid farming
| Updated on: Jun 28, 2026 | 1:29 PM
Share

आजच्या जगात, जेव्हा बहुतेक लोक AI आणि IT क्षेत्रात काम करण्याची आकांक्षा बाळगतात, तिथे छत्तीसगडच्या 28 वर्षीय पुष्पक साहूने एक पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. त्याने फुलांची शेती सुरू करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. त्याची सुरुवात सोपी नव्हती, पण कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारांनी त्याचे आयुष्य बदलून टाकले.  पुष्पक साहू पूर्वी PWC मध्ये एआय इंजिनिअर म्हणून काम करत होता. तो चांगला पगार मिळवत होता, पण त्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. म्हणून त्याने नोकरी सोडली आणि तो आपल्या गावी परतला. परतल्यानंतर त्याने ऑर्किडची शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोविड-19 दरम्यान, पुष्पकला लागवडीची आवड निर्माण झाली. या काळात त्याने ऑर्किड फुलांबद्दल बरेच काही शिकले. त्याला समजले की या फुलांना बाजारात चांगला भाव मिळतो आणि त्यांना मोठी मागणी आहे. त्यानंतर त्याने आपल्या छंदाला उत्पन्नाचे साधन बनवण्याचा निर्णय घेतला. पण या प्रवासाची सुरुवात अजिबात सोपी नव्हती.

ऑर्किड वाढवणे हे सोपे काम नाही. या फुलांना योग्य सूर्यप्रकाश, योग्य हवामान आणि वेळेवर पाणी देणे आवश्यक असते. यासाठी सखोल तयारी करावी लागते. सुरुवातीला पुष्पकला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याला खूप वेळ आणि पैसा गुंतवावा लागला. पण त्याने हार मानली नाही आणि प्रत्येक अडचणीतून शिकत तो पुढे जात राहिला.

आज पुष्पक साहूच्या रोपवाटिकेत दर आठवड्याला सुमारे 1,000 बादल्या ऑर्किडची फुले तयार होतात. ही फुले कोलाकाता, भुवनेश्वर, कटक, नागपूर आणि रायपूर यांसारख्या अनेक शहरांमध्ये पाठवली जातात. मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक या कामातून दर आठवड्याला सुमारे 30,000 रुपये कमावत आहे. पुष्पक साहू यांची कहाणी हे दाखवून देते की, योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाने शेतीतून भरीव उत्पन्न मिळवता येते. नोकरी सोडल्यानंतरही कठोर परिश्रमातून यश मिळवता येते. हे त्यांनी सिद्ध केले. आज त्यांचे यश अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?