AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1.5 लाख मृत्यूनंतर कोट्यावधी लोकांसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय, अनोखा प्लॅन लॉन्च

रस्ते सुरक्षेबाबत लोकांच्या सवयी बदलण्याच्या प्रयत्नात कंपनी आहे. हे गाणे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी गायले आहे.

1.5 लाख मृत्यूनंतर कोट्यावधी लोकांसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय, अनोखा प्लॅन लॉन्च
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
| Edited By: | Updated on: Mar 26, 2021 | 9:39 AM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने ‘राइड टू सेफ्टी’ गाणे लाँच केले आहे. रस्ते सुरक्षेबाबत लोकांच्या सवयी बदलण्याच्या प्रयत्नात कंपनी आहे. हे गाणे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी गायले आहे. या गाण्याचे प्रकाशन परिवहन व महामार्ग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. (nitin gadkari launches icici lombard ride to safety campaign)

जागतिक बँकेच्या 2018 च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी रस्ते अपघातात जास्तीत जास्त दीड लाख लोकांचा मृत्यू होत आहे. या अपघातांमुळे भारताचा जीडीपीच्या तीन टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील रस्ते अपघातात ठार झालेल्यांपैकी 37 टक्के लोक दुचाकी चालक होते. हेल्मेट न घातल्यामुळे 44,666 लोक मरण पावले. यापैकी 30148 लोक दुचाकी चालवत होते तर 14,518 लोक मागे बसले होते. 2019 मध्ये रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी हे 29.8 टक्के आहे. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत अधिक जागरूकता असणे आवश्यक आहे.

गाण्याद्वारे अनोखा संदेश

भारतातील संगीतातील लोकांची आवड पाहून आयसीआयसीआयने अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून एक ‘गीतों में गुंथी स्टोरीटेलिंग’ केले आहे. आयसीआयसीआय लोंबार्डच्या ‘राइड टू सेफ्टी’ या कल्पनेला पुढे आणणे हा या गाण्याचा उद्देश आहे. या गाण्याचे शब्द रस्ता सुरक्षा सूचनांचे वर्णन करतात. तसेच दुचाकी चालविताना काय करावे आणि काय करू नये याबद्दल यामध्ये सांगितले आहे. आयसीआयसीआयने सुरू केलेली ‘राइड टू सेफ्टी’ अभियान हा राष्ट्रीय स्तरावरील व्यावहारिक रस्ता सुरक्षा कार्यक्रम आहे. विशेषत: मुले आणि त्यांचे पालक यांच्यात जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

2 लाखाहून अधिक कार्यशाळा

त्याअंतर्गत 2016 पासून मेट्रो आणि देशातील अन्य प्रमुख शहरांमध्ये दोन लाखाहून अधिक मुले आणि त्यांचे पालक यांच्यात 700 पेक्षा जास्त रस्ते सुरक्षा कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यासह 1,30,000 मुलांना आणि त्यांच्या पालकांना आयएसआय गुण आणि खास मुलांसाठी बनविलेले हेल्मेट देण्यात आले आहेत. आता रस्ता सुरक्षिततेवरील गाणे सादर केल्याने, ही मोहीम संपूर्ण बांधीलकीसह खास आणि हृदय जिंकणार्‍या शैलीत लोकांना घेऊन जाईल. (nitin gadkari launches icici lombard ride to safety campaign)

संबंधित बातम्या – 

‘या’ 8 बँकांमध्ये खातं असेल तर होळीआधी करा महत्त्वाचं काम, अन्यथा नाही होणार व्यवहार

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे दिलासा, वाचा तुमच्या शहरातले दर

1 लाख गुंतवून होईल 1 लाख 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

(nitin gadkari launches icici lombard ride to safety campaign)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली