AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा आणि लसण राजकीय समीकरणं बिघडवणार?; तुटवडा वाढल्याने झाली दरवाढ, ऐन हिवाळ्यात ग्राहकांना फुटला घाम

Onion And Garlic Price Hike : कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने सध्या मुंबईकरांचे संकट वाढवले आहे. जेवणाला चविष्ट बनवणाऱ्या या दोन महत्त्वाच्या जिन्नसच गायब झाल्याने मुंबईकरांच्या जीभेची चव हरवली आहे. तुटवड्यामुळे कांदा आणि लसणाच्या किंमती भडकल्या आहेत. ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

कांदा आणि लसण राजकीय समीकरणं बिघडवणार?; तुटवडा वाढल्याने झाली दरवाढ, ऐन हिवाळ्यात ग्राहकांना फुटला घाम
कांद्यासह लसणाच्या किंमती भडकल्या
| Updated on: Nov 10, 2024 | 10:02 AM
Share

कांदा आणि लसणाने ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे. मुंबईत कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या पेस्टने रोजच्या जेवणाला रंगत येते. ते रूचकर आणि चविष्ट लागते. पण या दोन महत्त्वाच्या जिन्नसच हरवल्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने किंमती वाढल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

असा वाढला भाव

मुंबईतील बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कांदा ८० रुपये किलोवर तर लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन – चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.

का झाला तुटवडा

दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. परिणामी बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकर्‍यांकडे शिल्लक आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे, मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

कांद्याचे भाव भडकणार?

कांद्याचे भाव आणखी महिनाभर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्याने हा तुटवडा जाणवत आहे. दिवाळीमुळे नाशिक परिसरात कांद्याची खरेदी-विक्री आठवडाभर बंद होती. यंदा पावसाने कांद्या मोठ्या प्रमाणात खराब केला आहे. खरीप कांद्याच्या काढणीवर त्याचा परिणाम दिसून आला. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा आला आहे. आता या समस्येवर सरकारला लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. नाहीतर कांदा हा विधानसभा निवडणुकीतील मुद्दा व्हायला वेळ लागणार नाही.

Follow Us
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.