AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMAYU : 50 हजार पगार, तरीही नाही मालकीचे घर, आता मदत करणार मोदी सरकार

Modi Government PMAYU : 6 ते 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गींयांची सध्या मोठी अडचण झाली आहे. त्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. मुलांचे शिक्षण आणि इतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

PMAYU : 50 हजार पगार, तरीही नाही मालकीचे घर, आता मदत करणार मोदी सरकार
मोदी सरकारचा मध्यमवर्गाला मोठा दिलासा
| Updated on: Aug 17, 2024 | 3:34 PM
Share

स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आताच्या महागाईच्या जमान्यात अनेकांसाठी घर घेणं हे स्वप्नच ठरत आहे. महागाईने मध्यमवर्गाचे कंबरडे मोडून काढले आहे. मुलांचे शिक्षण, आई-वडिलांच्या उपचार आणि इतर खर्चामुळे गृहकर्जाचे ओझे ते शिरावर घेऊ शकत नाहीत. या मध्यमवर्गाला मोदी सरकारने मदत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एक योजना आणली आहे. बजेटमध्ये पण त्याची चर्चा झाली होती.

PMAY-U चा होणार फायदा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान निवास योजना-शहरी (PMAY-U) घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक वर्गासाठी घराचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच PMAY-U 2.0 ला मंजूरी दिली आहे. या योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS), कमी उत्पन्न गटातील आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) कुटुंबांसाठी घर खरेदी करणे अथवा तयार करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.

योजनेत 3 लाख रुपयांची कमाई करणारा वर्ग ईडब्ल्यूएस प्रवर्गात आहे. तर 3 लाख ते 6 लाखांदरम्यान वार्षिक कमाई करणारे कुटुंब एलआयजी श्रेणीत आहेत. तर 6 ते 9 लाख वार्षिक कमाई करणारा वर्ग हा एमआयजी वर्गात आहे. त्यांच्या उत्पन्नानुसार ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.

मध्यम वर्गाला पण केंद्राची मदत

6 ते 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कमाई करणारा एमआयजी वर्ग आहे. या गटातील मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या मध्यमवर्गाची वार्षिक कमाई 6 लाख रुपये आहे, ते पण या श्रेणीत येतील. 50 हजार रुपये महिना कमाई करणारे या वर्गात मोडतात. त्यांना घर बांधण्यासाठी अथवा घर खरेदीसाठी मोदी सरकार मदत करणार आहेत.

काय आहे योजना

वर्ष 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-शहरी सुरू करण्यात आली. योजनेतंर्गत 1.18 कोटी घरांना मंजूरी देण्यात आली. या योजनेतंर्गत 85.5 लाखांहून अधिक घरांची निर्मिती करुन लाभार्थ्यांना ती देण्यात आली आहेत. इतर घरे तयार होत आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गासाठी घर योजना सुरु करण्याचे जाहीर केले होते.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.