AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMAYU : 50 हजार पगार, तरीही नाही मालकीचे घर, आता मदत करणार मोदी सरकार

Modi Government PMAYU : 6 ते 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गींयांची सध्या मोठी अडचण झाली आहे. त्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. मुलांचे शिक्षण आणि इतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

PMAYU : 50 हजार पगार, तरीही नाही मालकीचे घर, आता मदत करणार मोदी सरकार
मोदी सरकारचा मध्यमवर्गाला मोठा दिलासा
| Updated on: Aug 17, 2024 | 3:34 PM
Share

स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आताच्या महागाईच्या जमान्यात अनेकांसाठी घर घेणं हे स्वप्नच ठरत आहे. महागाईने मध्यमवर्गाचे कंबरडे मोडून काढले आहे. मुलांचे शिक्षण, आई-वडिलांच्या उपचार आणि इतर खर्चामुळे गृहकर्जाचे ओझे ते शिरावर घेऊ शकत नाहीत. या मध्यमवर्गाला मोदी सरकारने मदत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एक योजना आणली आहे. बजेटमध्ये पण त्याची चर्चा झाली होती.

PMAY-U चा होणार फायदा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान निवास योजना-शहरी (PMAY-U) घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक वर्गासाठी घराचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच PMAY-U 2.0 ला मंजूरी दिली आहे. या योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS), कमी उत्पन्न गटातील आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) कुटुंबांसाठी घर खरेदी करणे अथवा तयार करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.

योजनेत 3 लाख रुपयांची कमाई करणारा वर्ग ईडब्ल्यूएस प्रवर्गात आहे. तर 3 लाख ते 6 लाखांदरम्यान वार्षिक कमाई करणारे कुटुंब एलआयजी श्रेणीत आहेत. तर 6 ते 9 लाख वार्षिक कमाई करणारा वर्ग हा एमआयजी वर्गात आहे. त्यांच्या उत्पन्नानुसार ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.

मध्यम वर्गाला पण केंद्राची मदत

6 ते 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कमाई करणारा एमआयजी वर्ग आहे. या गटातील मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या मध्यमवर्गाची वार्षिक कमाई 6 लाख रुपये आहे, ते पण या श्रेणीत येतील. 50 हजार रुपये महिना कमाई करणारे या वर्गात मोडतात. त्यांना घर बांधण्यासाठी अथवा घर खरेदीसाठी मोदी सरकार मदत करणार आहेत.

काय आहे योजना

वर्ष 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-शहरी सुरू करण्यात आली. योजनेतंर्गत 1.18 कोटी घरांना मंजूरी देण्यात आली. या योजनेतंर्गत 85.5 लाखांहून अधिक घरांची निर्मिती करुन लाभार्थ्यांना ती देण्यात आली आहेत. इतर घरे तयार होत आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गासाठी घर योजना सुरु करण्याचे जाहीर केले होते.

Follow Us
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली.
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.