AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेक ट्रंकेशन प्रणाली काय आहे? सप्टेंबपर्यंत 18 हजार बँकांमध्ये CTS लागू ? सामान्य माणसावर काय परिणाम होणार?

देशात सध्या 18 हजार बँका सीटीएस प्रणालीच्या बाहेर आहेत त्या बँकांना सीटीएसमध्ये आणलं जाणार आहे. RBI cheque truncation system

चेक ट्रंकेशन प्रणाली काय आहे? सप्टेंबपर्यंत 18 हजार बँकांमध्ये CTS लागू ? सामान्य माणसावर काय परिणाम होणार?
चेक क्लिअरींग
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 08, 2021 | 7:15 PM
Share

नवी दिल्ली: चेकचा वापर करुन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) चेक क्लिअरिंग संदर्भात मोठं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबरपासून बँकांच्या सर्व शाखांमध्ये सीटीएस (Cheque Truncation System) सिस्टीम सुरु होणार आहे. देशात सध्या 18 हजार बँका सीटीएस प्रणालीच्या बाहेर आहेत त्या बँकांना सीटीएसमध्ये आणलं जाणार आहे. सध्या देशातील काही शहरांमध्येचं सीटीएस पद्धती चेक वटवण्यासाठी वापरली जाते. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर वित्तीय धोरण सादर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. (RBI announced that all banks to have cheque truncation system by September 2021 which reduced cheque clearing time)

CTS प्रणाली 2010 पासून सुरु

आरबीआयनं भारतात सीटीसी सुविधा 2010 मध्ये सुरु केली होती. सध्या काही शहरांमध्ये सीटीएस सुविधा सुरु आहे. सप्टेंबर 2021 पासून देशातील बँकांच्या सर्व शांखांमध्ये ही सुविधा सुरु होईल. केंद्रीय बँकांनी चेक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. ही प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. याअंतर्गत 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा चेक वटवला जाणार आहे. सध्या 1.50 लाख शाखांमध्ये सीटीएस सुविधा सुरु आहे.

CTS चे फायदे

चेकनं व्यवहार करताना तो ज्या बँकेचा दिलेला असतो त्या बँकेत क्लिअरिंगसाठी घेऊन जावं लागत असे. मात्र, सीटीएस पद्धत सुरु झाल्यानंतर चेक वटवणं सोपं झालं आहे. सीटीएस प्रणालीमुळे चेक क्लिअरिंग सोपं आणि जलद झालं आहे. सीटीएस पद्धतीत चेक दुसऱ्या बँकेत घेऊन जावं लागत नाही. चेक ऐवजी त्याचं इलेक्ट्रोनिक प्रतिमा दुसऱ्या बँकेत पाठवली जाते. त्या बँकेकडून मंजुरी आल्यानंतर ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. यामध्ये चेक फाटणे किंवा खराब होणे, अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाहीत.

डिजीटल व्यवहारांमध्ये चेकचं महत्व

सध्या ऑनलाईन पेमेंटसचा जमाना असला तरी लोक चेकच्या वापरावर विश्वास ठेवतात. अजूनही चेकचा वापर महत्वाचा समजला जातो. हे पाहूनचं आरबीआयनं सीटीएस प्रणाली देशातील बँकांच्या प्रत्येक शाखांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पेटीएम, गुगल पे, फोन पे, एनईएफटी, आरटीजीएस सारख्या प्रणालींचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो.

संबंधित बातम्या:

चेक भरण्याची योग्य पद्धत; एक चूक आणि खाते होणार रिकामं

RBI Monetary Policy: आता चेक क्लिअरिंगला वेळ लागणार नाही, लवकरच नवा नियम लागू

(RBI announced that all banks to have cheque truncation system by September 2021 which reduced cheque clearing time)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली