AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात आरबीआयने घेतले 57.5 टन सोने, भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 35 टन, 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी करण्यात आली.

वर्षभरात आरबीआयने घेतले 57.5 टन सोने, भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?
Gold
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 26, 2025 | 10:53 AM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोन्याची जोरदार खरेदी सुरु केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 57.5 टन सोने भारताने घेतले आहे. यामुळे देशाच्या सुवर्ण भंडारात चांगलीच वाढ झाली आहे. देशाचा सुवर्ण भंडार 879.6 टन झाला आहे. आरबीआयकडून मागील सात वर्षांतील सर्वात मोठी सोने खरेदारी झाली आहे.

सोने नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील सोन्यात गुंतवणूक करत असतात. सर्वसामान्य व्यक्तींबरोबर रिझर्व्ह बँकेकडून आपले सुवर्ण भंडार वाढवले जात आहे. आरबीआयने सोन्याची खरेदी जागतिक अस्थिरता आणि डॉलरची परिस्थिती पाहून केली आहे. जगभरातील केंद्रीय बँका अमेरिकन डॉलरची निर्माण झालेली परिस्थिती आणि पश्चिम अर्थव्यवस्थेवरील दबाबामुळे सोने घेत आहेत. भारतसुद्धा त्या दिशेनेच पाऊल टाकत आहे. त्यामुळे आपला सुवर्ण भंडार मजबूत आणि संतुलित केला जात आहे.

कधी किती घेतले सोने?

‘इकोनॉमिक टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 35 टन, 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी करण्यात आली. 2024-25 मध्ये सोन्याची पुन्हा जोरदार खरेदी आरबीआयने केली. त्याला कारण डॉलरबाबत निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकन डॉलरमध्ये अनेक चढ-उतार दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळले आहे. आरबीआयने ही रणनीती भारताच्या विदेशी मुद्रा भंडारात विविधता आणण्यासाठी अवलंबली आहे. सन 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत ज्या देशांनी सर्वाधिक सोने घेतले आहे, त्यात भारताचा क्रमांक टॉप पाचमध्ये आहे.

भारताने आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी बहुतांश सोने इंग्लंड आणि इतर जागतिक बँकेत ठेवले आहे. सोने सुरक्षित गुंतवणूक आहे. अडचणीच्या काळात ते कामाला येते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येते. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि परदेशी कर्जाचा धोका देखील सोने खरेदीमुळे कमी होईल. याशिवाय जागतिक स्तरावर भारतीय रुपया मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रयत्न मानला जात आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?