AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरबीआयकडून सलग चौथ्यांदा रेपोरेटमध्ये वाढ; कर्जाचा हफ्ता नेमका कितीने वाढणार जाणून घ्या

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून नवं पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. नवं पतधोरण जाहीर करताना आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

आरबीआयकडून सलग चौथ्यांदा रेपोरेटमध्ये वाढ; कर्जाचा हफ्ता नेमका कितीने वाढणार जाणून घ्या
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 30, 2022 | 11:20 AM
Share

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) नवं पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. नवं पतधोरण जाहीर करताना आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करण्यात आली आहे. आरबीआयकडून रेपो रेट 50 बेसीस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. रेपो रेट वाढवण्याची यंदा ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तीन वेळेस आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ करण्यात आल्यानं रेपो रेट 5.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई (inflation) नियंत्रणात आणण्यासाठी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून सातत्याने रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येत आहे.

चालू वर्षात चौथ्यांदा वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यंदा आरबीयाकडून रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही चौथी दर वाढ आहे. यापूर्वी मे महिन्यात रेपो रेटमध्ये 0.4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय आरबीआयने जाहीर केला होता. त्यानंतर जून आणि जुलैमध्ये रेपो रेट अर्ध्या टक्क्याने वाढवण्यात आला होता.आज तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर चालू वर्षात रेपो रेट एकून चार वेळा वाढवण्यात आला आहे.

बैठकीला सहा सदस्यांची उपस्थिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये रेपो रेट 50 बेसीस पॉईंटने वाढवण्याच निर्णय घेतला आहे. या बैठकीला एकूण 6 सदस्यांची उपस्थिती होती. सहा सदस्यांपैकी 5 सदस्य हे रेपो रेट 50 बेसीस पॉईंट वाढवण्यात यावा या बाजुने होते. त्यामुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याने महागाई नियंत्रणात येण्याची अपेक्षा असल्यांचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.चालू वर्षात चारदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ईएमआय आणि कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. मात्र दुसरीकडे बँका देखील एफडीवरील व्याज दर वाढवू शकतात.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.