AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन! बँकिंग क्षेत्रात आता त्सुनामी, मुकेश अंबानी गेम पलटणार

Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन होणार आहे. हे विभाजन रिलायन्सच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण यामुळे बँकिंग क्षेत्रात त्सुनामी येण्याची शक्यता आहे.

Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन! बँकिंग क्षेत्रात आता त्सुनामी, मुकेश अंबानी गेम पलटणार
| Updated on: May 04, 2023 | 7:59 PM
Share

नवी दिल्ली : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) प्रत्येक क्षेत्रात दबदबा वाढवत आहेत. देशातील आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रात लवकरच त्सुनामी आणण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी रिलायन्सचे विभाजन करण्यात येईल. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (RSIL) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून वेगळी करण्यात येणार आहे. त्यांच्या या योजनेला शेअर होल्डर्स आणि क्रेडिटर्सकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे पेटीएम आणि बँकांना आता तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल.

जिओ आर्थिक क्षेत्रात प्रस्तावानुसार, आरएसआयएलचे नाव बदलून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड (Jio Financial Services Limited) असेल. या विलिनीकरणातून रिलायन्सच्या सध्याच्या शेअर होल्डरला एक शेअरच्या मोबदल्यात नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. कंपनीच्या संचालक मंडळाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या विलिनीकरणाला मंजुरी दिली होती. नवीन कंपनीला दिवाळी अगोदर शेअर बाजारात सुचीबद्ध करण्यात येऊ शकते.

या कंपन्यांचा समावेश 2 मे रोजी झालेल्या शेअर होल्डर्स आणि क्रेडिटर्सच्या बैठकीत नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळाली. रिलायन्सच्या या नविन आर्थिक कंपनीत रिलायन्स पेमेंट सोल्यूशन्स (Reliance Payments Solutions), जियो पेमेंट्स बँक (Jio Payments Bank), रिलायन्स रिटेल फायनान्स (Reliance Retail Finance) आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग (Reliance Retail Insurance Broking) यांचा समावेश असेल. तज्ज्ञांच्या मते, बँका, एनबीएफसी आणि फिनटेक कंपन्यांना आता तगडे आव्हान मिळू शकते.

भारतातील 5 वी मोठी बँक जेफरीजच्या दाव्यानुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसचे मार्केट व्हॅल्यूएशन 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 179 रुपयांच्या जवळपास असेल. तर मॅक्युरी रिसर्चनुसार, नवीन कंपनी झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस देशातील आर्थिक क्षेत्रातील 5 वी मोठी बँका असेल. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यानंतर जिओचा क्रमांक असेल. यंदा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोघांचे विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी फायनान्स कंपनी ठरेल.

बजाज, पेटीएम, फोनपेला टक्कर ॲनलिस्ट कंपनी जेफरीजच्या दाव्यानुसार, येत्या काही दिवसांत जिओ फायनान्शिअल सर्व्हिस बाजारात धुमाकूळ घालेल. ही कंपनी बाजारातील सध्याचे स्पर्धक बजाज फायनान्स, पेटीएम, फोनपेला जोरदार टक्कर देईल. जिओचे नेटवर्थ सर्वाधिक असल्याने बँकिंग सेक्टरमध्ये जिओ आता पाचव्या स्थानावर असेल. याआधारे जिओ फायनान्शिअल सर्व्हिस पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनाही मागे टाकेल.

रिलायन्स कुटुंबातील ग्राहकांना मोठा फायदा रिलायन्स कुटुंबातील ग्राहकांना या सेवेचा मोठा फायदा होईल. त्यांना आता कर्जासाठी, रिलायन्स स्टोअरमधील किंमती वस्तू खरेदीसाठी दुसऱ्या बँकेचे, आर्थिक सेवा पुरवठादारांची मदत घेण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळतील. जानेवारी 2023 नुसार, जिओ टेलिकॉमकडे जवळपास 42.6 कोटी ग्राहक आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.