AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्यात वाढल्याने साखर महागली

गेल्या काही महिन्यांमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलसह सर्वच वस्तू महागल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशात साखरेचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन देखील साखारेच्या दरात प्रति कोलो  5 रुपयांची वाढ झाली आहे.

निर्यात वाढल्याने साखर महागली
साखर
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 6:17 PM
Share

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलसह सर्वच वस्तू महागल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशात साखरेचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन देखील साखारेच्या दरात प्रति कोलो  5 रुपयांची वाढ झाली आहे. साखरेची निर्यात वाढवल्याने भाव वधारले असल्याचे दिसून येत आहे.  ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 26 जुलै 2021 ते 26 ऑक्टोबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत साखरेचे दर तब्बल पाच रुपयांनी वाढले आहेत. 26 जुलै 2021 ला साखरेचे दर 38 रुपये प्रति किलो होते.  त्यामध्ये वाढ होऊन 26 ऑक्टोबरला साखर 43 रुपयांवर पोहोचले आहेत.

भारतामध्ये दरवर्षी साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र गेल्या वर्षी जगासह देशावर कोरोनाचे संकट असल्याने निर्यातीला ब्रेक लागला होता. निर्यात घटल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला, त्यामुळे दर नियंत्रणात होते. मात्र आता हळूहळू जग कोरोनाच्या संकटातून सावरत असून, निर्यातीला वेग आला आहे. भारताने साखरेची निर्यात वाढवल्याने गेल्या तीन महिन्यामध्ये साखरेचे दर वाढले असल्याचे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चालू वर्षामध्ये साखर कारखान्यांनी तब्बल 72 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. केंद्राकडून कारखान्यांना निर्यात करामध्ये सूट देण्यात आली असून, त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा सध्या साखर उद्योगाला होत  आहे. मात्र निर्यात वाढल्याने दुसरीकडे देशांतर्गत साखरेचे दर देखील वाढले आहेत.

अनेक देशांत साखरेची टंचाई 

विविध देशांकडून इंधनाला पर्याय म्हणून ऊसापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे ऊसापासून अधकाधिक प्रमाणात इथेनॉलची निर्मिती करण्यात येत असून, परिणामी साखरेची टंचाईन निर्माण झाली आहे. भारत जगातील  साखर निर्यात करणार एक प्रमुख देश असून, अनेक देशांना भारतातून साखर पुरवली जाते. सध्या साखरेचा तुटवडा असल्याने मागणी वाढली आहे. परंतु दुसरीकडे निर्यात वाढल्याने भारतामध्ये साखर महाग झाली आहे.

संबंधित बातम्या

धनत्रयोदशीच्या  मुहुर्तावर सराफा बाजारात तेजी

दिवाळी धमाका: गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करा आणि वयाबरोबर कमाई वाढवा

दिवाळी बोनसची ‘इथे’ करा गुंतवणूक; मिळवा अधिक फायदा

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.