AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगा भारताचा कांदा कसा विकणार? निर्यातीबाबतचा नवीन नियम धडकलाच नाही, शेकडो कंटेनर अडकले, तर बांगलादेशच्या या निर्णयाने वाढवली चिंता

Onion Export Policy : केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य हटविण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभेच्या तोंडावर घेतलेल्या या नियमाच्या अंमलबजावणीला मात्र अजून मुहूर्त साधला गेला नाही. उलट बांगलादेशाने घेतलेल्या एका निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सांगा भारताचा कांदा कसा विकणार? निर्यातीबाबतचा नवीन नियम धडकलाच नाही, शेकडो कंटेनर अडकले, तर बांगलादेशच्या या निर्णयाने वाढवली चिंता
कसा विकणार बाहेरील देशात कांदा?
| Updated on: Sep 17, 2024 | 10:37 AM
Share

कांद्यावरील किमान निर्यातमूल्य हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. या निर्णयामुळे थेट परदेशात शेतकऱ्यांना कांदा निर्यातीचा मार्ग खुला झाला. पण या निर्णयाची प्रतच अजून संबंधित विभागांना पाठविण्यात आला नसल्याने सीमाभागात आणि पोर्टवर कांद्याचे कंटेनर्स अडकून पडले आहेत. तीन दिवसांपासून नियमांची अंमलबजावणीच न झाल्याने सरकारी विभागातील अनागोंदी उघड झाली आहे. तर दुसरीकडे बांगालदेश सरकारच्या नवीन नियमाने भारताची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे भारताचा कांदा परदेशात कसा विकणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

काय झाला निर्णय

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील 550 डॉलरचे किमान निर्यातमूल्य पूर्णपणे हटविण्याचा निर्णय घेतला. तर कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क 40 टक्क्यांहून 20 टक्के केले. या निर्णयमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला खरा, पण त्यांचा कांदा अजूनही बंदरात आणि सीमावर्ती भागात अडकून पडल्याचे समोर आले आहे. परिणामी शेतकरीच नाही तर व्यापारी सुद्धा चिंताग्रस्त झाले आहे.

या नवीन नियमांची प्रतच प्राप्त न झाल्याने कांद्याने भरलेले कंटेनर्स बंदरात आणि सीमावर्ती भागात अडकून पडले आहे. उत्पादन शुल्क विभागाकडे या नवीन निर्णयाची प्रतच न आल्याने केंद्र सरकारच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. यापूर्वीच्या गोंधळात या गोंधळाने भर घातली आहे. यापूर्वी निर्यातबंदी घालणे, ती उठवणे, मध्येच निर्यातमूल्य वाढवणे असा गोंधळ पाहायला मिळाला. आता चार दिवसात निर्णयाची माहिती संबंधित विभागाला न मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी संतप्त झाले आहेत.

बांगलादेशचा निर्णय काय?

बांगलादेश सरकारने भारतासह एकूण 9 देशातून कांदा आयातीला परवानगी दिली आहे. भारताच्या कांद्यावरील गोंधळाचा इतर देशांनी विशेषतः पाकिस्तानने सर्वाधिक फायदा उचलला आहे. भारताने कांदा निर्यातबंदी आणि निर्यात शुल्क वाढविण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्याचे परिणाम आता दिसून आला आहे. भारतासह इतर देशाच्या कांदा आयातीला नवीन सरकारने परवानगी दिली आहे. कृषी मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली.

त्यानुसार, पाकिस्तानकडून 11,820 टन, चीनमधून 2400 टन, इजिप्त या देशाकडून 3,910 टन, कतारकडून 1100 टन, तुर्की या देशातून 2100 टन, शेजारील म्यानमारमधून 200 टन, थायलंडमधून 33 टन, नेदरलँडमधून 4 टन तर युएईकडून 3 टन आयात करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. भारताने निर्यात शुल्क वाढवल्यानंतर बांगलादेशाच्या बाजारात कांद्याच्या किंमती वाढल्या. या किंमती कमी करण्यासाठी तिथल्या सरकारने इतर देशातून कांदा आयातीला आता परवानगी दिली आहे.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.