AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी तीन बँकांना आरबीआयकडून दंड; चेक करा यामध्ये तुमची बँक तर नाहीना?

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने (RBI) आणखी तीन सहकारी बँकाना(Cooperative Banks) दंड केला आहे. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून या तीन बँकांना मिळून एकूण पाच लाखांचा दंड करण्यात आला आहे.

आणखी तीन बँकांना आरबीआयकडून दंड; चेक करा यामध्ये तुमची बँक तर नाहीना?
आरबीआय बँक
| Updated on: Feb 22, 2022 | 8:20 AM
Share

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने  (RBI) आणखी तीन सहकारी बँकाना(Cooperative Banks) दंड केला आहे. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून या तीन बँकांना मिळून एकूण पाच लाखांचा दंड करण्यात आला आहे. दंड करण्यात आलेल्या बँकांमध्ये जम्मू काश्मीरमधील बारामूल्ला सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँकेसह तामिळनाडूमधील द बिग कांचीपुरम को- ऑपरेटिव्ह बँक आणि चेन्नई सेंट्रल को- ऑपरेटिव्ह बँक (Chennai Central Co-operative Bank) यांचा समावेश आहे. बँकिंग व्यवहारामध्ये असलेली अनियमितता, तसेच कर्ज वाटपाबाबत आरबीआयने घालून दिलेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणात या तीनही बँकांना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यातील बारामूल्ला सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक आणि द बिग कांचीपुरम को- ऑपरेटिव्ह बँकेला प्रत्येकी दोन लाखांचा तर चेन्नई सेंट्रल को- ऑपरेटिव्ह बँकेला एक लाखंचा दंड ठेठावण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील बँकिंग व्यवहारात अनियमिता आणि आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक बँकांना दंड ठोठवाण्यात आला आहे.

दंडाची रक्कम भरण्याचे निर्देश

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आरबीआयने घालून दिलेल्या कर्ज वापटपाबाबतच्या तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने बारामूल्ला सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक आणि द बिग कांचीपुरम को- ऑपरेटिव्ह बँकेला प्रत्येकी दोन लाखांचा तर चेन्नई सेंट्रल को- ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख असा तीन बँका मिळून एकूण पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम जमा करण्याचे तसेच इथून पुढे आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करण्याचे निर्देश देखील संबंधित बँकांना देण्यात आले आहेत. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे. याचा ग्राहकांच्या व्यवहारांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे देखील आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र इंडिपेंडंस को- ऑपरेटिव्ह’चे लायन्सस रद्द

या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयकडून महाराष्ट्र इंडिपेंडंस को- ऑपरेटिव्ह बँकेचे लायन्सस रद्द करण्यात आले आहे. आरबीआयने संबंधित बँकेचे लायन्सस तीन फेब्रुवारी 2022 रोजी रद्द केले. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने आरबीआने या बँकेवर निर्बंध घातले होते. सहा महिने या बँकेला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे निर्देश आरबीआयकडून देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यानंतर देखील बँकेची स्थिती न सुधारल्याने अखेर या बँकेचे लायन्सस रद्द करण्यात आले.

संबंधित बातम्या

शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताय ? फायदे अन् तोटे माहिती करून घ्यायला हवं! आधी जाणून घ्या मग खुशाल वापर करा…

Maha-Infra Conclave: हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; ‘टीव्ही9 मराठीची आज कॉनक्लेव्ह’

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली