AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato-Onion Rate : अवकाळीचा शेतकरीच नाही तर ग्राहकांना पण फटका; टोमॅटो आणि कांदा किचन बजेट बिघडवणार

Tomato Onion Rate Hike : जून महिन्याच्या सुरुवातीलाच टोमॅटोचे भाव 24 रुपयांहून 30 रुपयांच्या घरात पोहचले आहेत. तर येत्या महिनाभरात टोमॅटो 80 ते 100 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. कांद्याचा भाव पण वाढण्याची शक्यता आहे.

Tomato-Onion Rate : अवकाळीचा शेतकरीच नाही तर ग्राहकांना पण फटका; टोमॅटो आणि कांदा किचन बजेट बिघडवणार
टोमॅटो-कांदा रडवणारImage Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jun 03, 2025 | 3:22 PM
Share

महाराष्ट्रासह दुसर्‍या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांतील पिकांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, कांद्यासह इतर नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्तर भारतासह अनेक मोठ्या शहरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. जूनच्या सुरुवातीलाच टोमॅटो 24 रुपयांहून 30 रुपयांवर पोहचला आहे. तर महिनाभरात हा भाव 80-100 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या किंमतीत किलोमागे 6 रुपयांची दरवाढ झाली आहे. एका महिन्यात कांद्याचा भाव 50 रुपयांपेक्षा अधिक वधारण्याची भीती व्यक्त होत आहे.

20 टक्क्यांची वाढ

राज्यात मे महिन्यातच अवकाळी आणि पूर्व मान्सूने धडक दिली. त्यामुळे अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. त्यात नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा काढणी सुरू असतानाच पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यातच कांद्याच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ दिसून आली. पावसामुळे कांदा आणि टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. तर तुफान पावसामुळे भाजीपाला वाहतूक आणि पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. त्यामुळे उत्तर भारतातच नाही तर देशातील अनेक भागात दोन्ही मालाच्या किंमतीत वाढ दिसून आली. किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसात किती वधारला भाव?

जूनच्या सुरुवातीच्या दोन दिवसात टोमॅटोची किंमत 40 ते 50 टक्क्यांनी वधारली. किरकोळ किंमतीत वाढ दिसून आली. 31 मे रोजी देशाची राजधानी दिल्लीत कांद्याची किरकोळ किंमत 20 रुपये प्रति किलोग्रॅम होती, 2 जून रोजी ती वाढून 30 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली. तर टोमॅटोचा भाव 2 जून रोजी 20 रुपयांहून थेट 35 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला. दोन दिवसात टोमॅटो प्रति किलो 15 रुपयांनी वधारला. तर तर कांद्याच्या किंमतीत 50 टक्के तेजी दिसून आली.

नाशिकच्या बाजारात सुद्धा पंधरवाड्यात कांद्याच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ दिसून आली. लासलगाव कांदा मार्केटमध्ये 15 दिवसात कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. उत्पादन आणि साठा असतानाही कांदा महागला आहे. व्यापाऱ्यांच्या मते कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असते पण अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. त्याचा परिणाम आता उत्पादनवर दिसून येत आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्यास किंमती वधारण्याची शक्यता आहे. लासलगावच्या घाऊक बाजारात कांदा 15 मे रोजी 11.50 रुपये प्रति किलोने विक्री झाला तर 31 मे रोजी एक किलोसाठी 14 रुपये मोजावे लागले. किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.