AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food Price Repo Rate : अन्नधान्यासह भाजीपाला स्वस्त, तरीही रेपो दर का वाटणार डोक्यावर मिरी!

Food Price Repo Rate : RBI ने किरकोळ महागाई दर 6.5 टक्के ठेवण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. बाजारात भाजीपाल्यापासून ते अन्नधान्याचे आणि आता खाद्यतेलाचे दर आटोक्यात आहेत. मग आरबीआय पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची भाषा का वापरत आहे.

Food Price Repo Rate : अन्नधान्यासह भाजीपाला स्वस्त, तरीही रेपो दर का वाटणार डोक्यावर मिरी!
का वाढेल रेपो दर
| Updated on: Mar 14, 2023 | 10:17 AM
Share

नवी दिल्ली : देशात महागाईच्या (Inflation) आघाडीवर सर्वच काही अलबेल आहे, असा दावा कोणीही करणार नाही. पण परिस्थिती आटोक्यात आहे, हे निदान सांगता येईल. अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेलाच्या किंमती आटोक्यात आल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price) एकदाच वाढवून, त्यानंतर त्यात 22 मे 2022 रोजीनंतर कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यात किरकोळ वाढ होऊन, घसरण होते. ग्राहक मूल्य सूचकांक सातत्याने घसरणीला आहे. एकदमच दिवाळी सारखा आनंद व्यक्त करण्याची स्थिती नाही. पण परिस्थितीत अनुकूल होत आहे. पण तरीही देशाची केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याचा हट्ट का करत आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

भारतीय ग्राहक मूल्य, किंमत निर्देशांक (CPI) या जानेवारी महिन्यात 6.52 टक्के होता. तर फेब्रुवारी 2022 मध्ये फेब्रुवारी महिन्यात हा दर 6.07 टक्के होता. खाद्य वस्तूंचा महागाई दर फेब्रुवारी महिन्यात घसरुन 5.95 टक्क्यांवर आला. जानेवारीपेक्षा हा दर घसरला. परंतु, मीडियातील अहवालानुसार, फेब्रुवारीत किरकोळ महागाई दर घसरला असला तरी तो आरबीआयने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक आहे. म्हणजे आरबीआयने जो ठोकताळा लावला आहे, त्यापेक्षा महागाई दर अधिक आहे. त्यासाठीच आरबीआय तिचा जालीम उपाय राबविणार आहे.

मीडियातील दाव्यानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 वगळता किरकोळ महागाई दर गेल्या वर्षात आरबीआयच्या अपेक्षेपेक्षा जास्तच होता. म्हणजे जवळपास 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आरबीआयने 2022-23 या वर्षासाठी किरकोळ महागाई दर 6.5 टक्के राहील, असा अंदाज बांधला आहे. केंद्रीय बँक हा महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे. पण बँकेला त्यात अद्यापही यश आलेले नाही. महागाईसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.

आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी आरबीआयने रेपो दरात 2.25 टक्के वाढ केली होती. आरबीआय गव्हर्नर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे

चर्चेनुसार, पेट्रोल-डिझेलचे दर जर आटोक्यात आले. त्यात कपात झाली, तर आरबीआयला सध्या रेपो दर वाढीसाठी कसरत करावी लागणार आहे, ती टळू शकते. पण केंद्र सरकार याबाबतीत अद्यापही ठोस निर्णय घेत नसल्याचे समोर येत आहे. रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदीचा निर्णय योग्य असला तरी त्याची फायदा जनतेला होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.