AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचे दागिने बनवणारे कारागिर कपडे का जाळतात ? काय आहे यामागचे कारण

सोन्याचे दर अवाच्या सवा झालेले आहेत. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरत आहे. दागिने घडवणारे कारागिर सोन्याचे दागिने तयार केल्यानंतर त्यांचे कपडे जाळत असतात. काय आहे या मागचे कारण ?

सोन्याचे दागिने बनवणारे कारागिर कपडे का जाळतात ? काय आहे यामागचे कारण
Goldsmith
| Updated on: May 26, 2026 | 11:05 PM
Share

सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. एखादा दागिने तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. अशात सोन्याचे दागिने तयार करणारे कारागिरही प्रत्येक ग्रॅम सोन्याचा चांगल्या प्रकारे वापर करतात आणि अगदी नाजूकपणे गोल्ड ज्वेलरी तयार करतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? हे ज्वेलर्स दागिने तयार करताना जो कपडा वापरतात, त्यांना काम संपल्यानंतर जाळून टाकतात. एवढेच काय ज्या कपड्याने मशिन आणि टेबल स्वच्छ करतात, त्या कपड्यालाही ते सांभाळून ठेवतात आणि नंतर तो कपडाही जाळतात.एवढेच नाही तर जेथे दागिने घडवले जातात तेथील कारपेट देखील एका काळानंतर जाळले जाते.

तुम्ही विचार करत असाल की हे दागिने कारागिर असे का करत असतील आणि या कपड्यांना फेकण्या ऐवजी का जाळत असतील. तर समजून घेऊयात अखेर हे दागिने कारागीर का करतात ?

वास्तविक या गोष्टीचा खुलासा सोने कारागिरी लोकांनी स्वत: केला आहे. दागिने तयार करताना कारागिर स्वत:चे कापड, कारपेट, चादर जुनी झाल्यानंतर फेकून न देता ती जाळतात. मात्र, दागिने कारागिर त्यांचे कपडे जाळण्यामागे कारण काय ?

कपडे का जाळतात कारागिर ?

दागिने ज्या कपड्याच्या मदतीने दागिने घडवतात त्या कपड्यांना कामानंतर फेकून न देता जाळतात. या मागे कारण काय तर कारण अगदी साधे आहे. सोन्याला दागिन्यात घडवताना अनेकदा त्याचा आकार बदलावा लागतो. वेगवेगळा आकार देताना आणि कोरीव काम करत असताना सोन्याचे कण या कपड्यांना लागत असतात. तसेच हे सोने जमीनीच्या कारपेटवर देखील पडते.

अशात कारागिर ठराविक वेळानंतर मशीन आणि आजूबाजीची जागा स्वच्छ करताना कापडाचा वापर करत असतात. या कपड्यांना ते सुरक्षित ठेवत असतात. नंतर काही काळानंतर या कपड्यांना जाळून त्यात अडकलेले सोने काढतात. त्यामुळे ते कारपेट आणि चादरींना जाळतात. ज्यावर ते बसतात.

या कपड्यातून किती सोने निघते ?

जेव्हा कारागिरांना विचारले गेले की या अशा कपड्यांना जाळल्याने किती सोने मिळते. तेव्हा त्यांना सांगितले की एक वर्षात सुमारे १० ग्रॅम सोने या कपड्यातून जमा होते. या वरुन तुम्हाला अंदाज येईल की खराब कपड्यांमध्येही किती सोने लपलेले असते, याच कारणामुळे सोने कारागिर वारंवार मशिनींना स्वच्छ करत असतात.

Follow Us
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; पाऊण तास उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात नेमकं काय होतं?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध