AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agniveer : अग्निवीर भरती नियमांमध्ये मोठा बदल, आता ‘हे’ विद्यार्थीसुद्धा करू शकणार आवेदन

16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर (जनरल ड्यूटी) (सर्व शस्त्र) साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) साठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

Agniveer : अग्निवीर भरती नियमांमध्ये मोठा बदल, आता 'हे' विद्यार्थीसुद्धा करू शकणार आवेदन
अग्निवीर Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 21, 2023 | 3:17 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या वर्षी केंद्रातील एनडीए सरकारने तिन्ही सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना (Agniveer New rule) जाहीर केली होती. सरकारने आता अग्निवीर योजनेंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले आहेत. पूर्व-कुशल तरुण देखील अग्निवीर भरतीमध्ये भाग घेऊ शकतील. ITI- पॉलिटेक्निक पास आउट तांत्रिक शाखेत अर्ज करू शकतील. यामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळेल. एवढेच नाही तर प्रशिक्षणाचा वेळही कमी होईल. या मोठ्या बदलानंतर आता आणखी तरुण उमेदवारांना या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

भरती प्रक्रीयेला सुरूवात

गेल्या 16 फेब्रुवारीपासून अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अग्निवीर भरती वर्ष 2023-24 साठी अविवाहित पुरुष उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे तर निवड चाचणी 17 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

अधिसूचनेनुसार, अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर कीपर, ट्रेड्समन ही पदे भरली जातील. अग्निवीर निवड प्रक्रियेत नुकत्याच झालेल्या बदलांनंतर आता उमेदवारांना आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल. 17 एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

अर्जासाठी वर्धित निकष

16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर (जनरल ड्यूटी) (सर्व शस्त्र) साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) साठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर लिपिक (स्टोअर कीपर) पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह 12वी पास अर्ज करू शकतात. अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी 8वी-10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आऊट झालेले तरुणही नव्या बदलासाठी अर्ज करू शकतील. या प्रशिक्षित तरुणांना लष्कराच्या तांत्रिक शाखेत अर्ज करावा लागणार आहे. त्यांचे प्रशिक्षणही कमी वेळेचे असेल.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा