AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीच्या लग्नासाठी पैसे नाही, शेतकरी बापाने घेतला टोकाचा निर्णय, थेट मृतदेहच घरी आला

Washim News : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लेकीच्या लग्नाचा बस्ता खरेदीसाठी पैसे नसल्याने चिंतेत असलेल्या एखा शेतकरी बापाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

लेकीच्या लग्नासाठी पैसे नाही, शेतकरी बापाने घेतला टोकाचा निर्णय, थेट मृतदेहच घरी आला
Farmer DiedImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 21, 2026 | 8:09 PM
Share

आपल्या मुलीच्या लग्नासाठी प्रत्येक बाप पै-पै जमवत असतो. लेकीचे लग्न धुमधडाक्यात व्हावं, लग्नात कोणताही अडथळा येऊ नये असं प्रत्येक बापाला वाटत असतं. मात्र आता वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लेकीच्या लग्नाचा बस्ता खरेदीसाठी पैसे नसल्याने चिंतेत असलेल्या एखा शेतकरी बापाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या वेदनादायक बातमीने पांगरी नवघरे परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने राजू कालापाड यांनी जीवन संपवलं

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजू कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीये. राजू कालापाड यांच्या मुलीचं लग्न 14 मार्च होणार होतं. आज लग्न बस्त्याची खरेदी होणार होती, मात्र पैश्याची जुळवा जुळव नं झाल्यानं आर्थिक विवंचनेतून राजू कालापाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

गळफास घेत आत्महत्या

राजू कालापाड यांच्याकडे अवघी एक एकर शेती आहे. गेल्या काही वर्षात अपेक्षित उत्पन्न शेतात न झाल्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढला होता. हे कर्ज फेडण्यासाठी राजू पत्नीसह पुण्यात मोलमजुरी साठी गेले होते. मोलमजूरी करून मुलीच्या लग्नासाठी काही दिवसांपासून ते गावी आले होते. लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. बस्ता खरेदीचा दिवस असल्याने नातेवाईकही घरी जमले होते. मात्र पैसांची जुळवाजुळव न झाल्याने राजू यांनी आज सकाळी शेतात जाऊन झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

परिसरावर शोककळा

राजू यांना एक मुलगी आणि दोन लहान मुलं आहेत. अवघ्या एका महिन्यावर मुलीचे लग्न आले होते. त्या पूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्यानं गावकर्‍यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना पित्याचा मृतदेह घरी आल्याने मुलीसह नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, याआधीही अनेक गरीब शेतकऱ्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे.

Follow Us
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.