AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निवीरांबाबत सैन्यदलाचा महत्वाचा निर्णय, परमानंट व्हायचंय तर ही मोठी अट पाळा, अन्यथा शर्यतीतून बाहेर

अग्निवीर योजनेवर विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे.आता अग्निवीरांची पहिली बॅच सेवानिवृत्त होणार आहे. मात्र, चार वर्षांच्या सेवेनंतर ज्यांना परमानंट सैनिक व्हायचे असेल त्यांना एक मोठी अट लावण्यात आली आहे.

अग्निवीरांबाबत सैन्यदलाचा महत्वाचा निर्णय, परमानंट व्हायचंय तर ही मोठी अट पाळा, अन्यथा शर्यतीतून बाहेर
agniveer news
| Updated on: Jan 05, 2026 | 11:25 PM
Share

भारतीय सैन्याच्या अग्निवीर योजनसंदर्भात सरकारकडून एक महत्वाची माहीती समोर आली आहे. साल 2022 मध्ये सुरु झालेल्या या योजनेची पहिली बॅच आता चार वर्षांची सेवा पूर्ण करणार आहे.अशात हजारो अग्निवीरांच्या भविष्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले असताना आता भारतीय सैन्याने नियम जारी करीत याचे उत्तर दिले आहेत. भारतीय सैन्याने स्पष्ट केले की जर पर्मानंट सैनिक व्हायचे असेल तर प्रक्रीयेत शिस्त आणि नियमांचे पालन करणे सर्वाधिक गरजेचे असणार आहे.

जून-जुलैमध्ये हजारो अग्निवीर डिस्चार्ज

मिळालेल्या माहितीनुसार जून आणि जुलै महिन्यात २० हजाराहून जास्त अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षांच्या सेवापूर्तीनंतर त्यांना डिस्चार्ज केले जाणार आहे. यात सुमारे २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन, लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमतेआधारे कायम सैनिक म्हणून पुन्हा सैन्यात रुजू करण्याची संधी मिळणार आहे.

लग्नासंदर्भात सैन्याचे कठोर नियम

परमानंट होण्यासंदर्भात सैन्याने लग्ना संदर्भात नियमांना स्पष्ट केले आहे. भारतीय सैन्य दलाच्या मते अग्निवीर आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळादरम्यान लग्न करु शकणार नाहीत. डिस्चार्ज झाल्यानंतर लागलीच लग्नाची परवानगी दिली जाणार नाही. जोपर्यंत परमानंट सैनिक बनण्याची निवड प्रक्रीया पूर्ण समाप्त होत नाही आणि अंतिम परिणाम घोषीत केले जात नाहीत तोपर्यंत अग्निवीरांना अविवाहित राहावे लागणार आहे.

नियम तोडला तर परमानंट नोकरी जाणार

सैन्य दलाने स्पष्ट केले आहे की जर कोणा अग्निवीराने या नियमांचे उल्लंघन करीत या काळात लग्न केले तर त्यास परमानंट सैनिक पदासाठी अयोग्य घोषीत केले जाईल.असे उमेदवार निवड प्रक्रीयेच्या बाहेर जातील, मग भले त्यांचे प्रदर्शन कितीही चांगले असेल.

वय आणि निवड प्रक्रिया

अग्निवीरांचा भरती सर्वसाधारणपणे २१ व्या वयापर्यंत होत आहे. आणि त्यांना २५ वर्षाचे असताना डिस्चार्ज केले जाते. यानंतर परमानंट होण्याच्या प्रक्रियेसाठी सुमारे ४ ते ६ महिन्यांचा काळ लागू शकतो. या दरम्यान सैन्याचे नियम आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे असे सैन्य दलाने म्हटले आहे.

केवळ योग्य आणि शिस्तबद्ध अग्निवीरांना संधी

या परमानंट नेमणूकीसाठी तेच अग्निवीर अर्ज करु शकतात ज्यांनी त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आणि चांगला रेकॉर्ड केला आहे. जे या काळात अविवाहित असतील त्यांनाच परमानंट होण्याची संधी मिळणार आहे.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....