Job News: भारतीय तटरक्षक दलामध्ये 350 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 350 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

Job News: भारतीय तटरक्षक दलामध्ये 350 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
भारतीय तटरक्षक दल
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 8:40 PM

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 350 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 350 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 जुलैपासून सुरु होणार आहे. (Indian Cost Guard recruitment 2021 for 350 post check here for details)

कोणत्या पदांसाठी भरती?

भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार नाविक (जनरल ड्युटी) नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल) आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी भरती होणार आहे.

पदसंख्या

नाविक (जनरल ड्युटी):260 नाविक (डोमेस्टिक ब्रँच): 50 यांत्रिक (मेकॅनिकल): 20 यांत्रिक (इलेक्ट्रिकल): 13 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स): 07

अर्ज कसा करायचा?

पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 2 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

नाविक (जनरल ड्युटी): उमदेवार बारावी विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह उत्तीर्ण झालेले असावेत. नाविक (डोमेस्टिक ब्रँच): मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असावा. यांत्रिक : मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असावा. इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, रेडिओ पॉवरमधील एआयसीटीईद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून पदविका उत्तीर्ण असावा.

निवड प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदासाठी तीन टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमदेवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर त्यांना शारीरिक चाचणी देखील घेतली जाईल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. पहिले दोन टप्पे यशस्वी पार केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करुन वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं जाईल.यशस्वी उमदेवारांना प्रशिक्षणासाठी बोलावलं जाईल, फेब्रुवारी 2022 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

परीक्षा फी

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमदेवारांना कोणतंही परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही. इतर उमेदवारांना 250 रुपये परीक्षा फी भरावी लागेल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या:

Skill India Mission : या योजनेतंर्गत तरुणांना सरकारकडून ट्रेनिंग आणि रोजगार, पाहा कसा लाभ घ्यायचा?

IBPS RRB Recruitment 2021 Notification: प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये 10368 जागांवर भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी

Indian Cost Guard recruitment 2021 for 350 post check here for details

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.