AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्र पोलिस दलात मेगा भरती, पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, तब्बल इतक्या जागा…

Maharashtra Police Force Recruitment 2025 : पोलिस होण्याचे स्वप्न आता अनेकांचे पूर्ण होणार आहे. पोलिस दलात मेगा भरती राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही खरोखरच मोठी संधी आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्र पोलिस दलात मेगा भरती, पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, तब्बल इतक्या जागा...
Maharashtra Police
| Updated on: Aug 12, 2025 | 1:21 PM
Share

मागील काही दिवसांपासून राज्यातील तरूण पोलिस भरतीची वाट पाहत होते. आता शेवटी पोलिस भरतीबद्दल सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. ज्यामुळे पोलिस होण्याचे अनेकांचे स्वप्न पुर्ण होईल. गृहविभागाने महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी दिली आहे. पोलिस भरती प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या तरूणांसाठी गोड बातमीच म्हणावी लागणार आहे. अनेक दिवसांपासून भरतीचा सराव मुले करत होती. मात्र, भरतीबद्दल सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा होत नसल्याने सर्वजण चितेंत होते.

महाराष्ट्र पोलिस दलात ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. पोलिसांच्या 15,000 पदांसाठी मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. सध्या भरतीसाठी मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली असून अर्ज करण्याची तारीख आणि बाकी सर्व प्रक्रियांची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

महापालिकांच्या निवडणुकांच्या अगोदरची ही भरती प्रक्रिया पार पडेल, अशी एक चर्चा आहे. 15,000  जागांसाठी लाखांच्या घरात उमेदवारांचे अर्ज येण्याची शक्यता आहे. यासोबतच या मंत्रिमंडळ बैठकीत अजूनही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आली आहेत. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलीये. रायगडचा पालकमंत्रिपदाचा तिढा हा अजून सुटलेला नाहीये.

त्यामध्ये आता 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजावंदन होणार असल्याने भरत गोगावले हे नाराज झाले असून ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. उलट ते दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे हे श्रीनगरच्या दाैऱ्यावर असल्याने ते व्हिडीओच्या माध्यमातून या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते. पोलिस भरतीच्या निर्णयामुळे तरूणांना मोठा दिलासा हा नक्कीच मिळाला आहे. शासनाकडून भरती प्रक्रियेची अधिक माहिती लवकरच दिली जाईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.