AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१०वी/१२वी नंतर चिंता नाही! ‘हा’ ३ वर्षांचा डिप्लोमा देईल मोठ्या कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी

१०वी-१२वी झाली, आता पुढे काय? पारंपरिक मार्गांपेक्षा काहीतरी वेगळं, जे कमी वेळेत देईल मोठ्या कंपन्यांमध्ये थेट नोकरीची हमी, असा कोर्स आहे का? होय! इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधील एक ३ वर्षांचा डिप्लोमा तुमच्या करिअरला देऊ शकतो एक नवी दिशा! चला, जाणून घेऊया या संधीबद्दल!

१०वी/१२वी नंतर चिंता नाही! 'हा' ३ वर्षांचा डिप्लोमा देईल मोठ्या कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी
मिळवा नोकरीImage Credit source: गुगल
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 03, 2025 | 2:29 PM
Share

दहावी आणि बारावीचा निकाल लागला की विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो तो म्हणजे आता पुढे काय करायचं? कोणतं क्षेत्र निवडायचं, ज्यामुळे चांगलं करिअर घडेल? अनेकजण पारंपरिक मार्गांचा विचार करतात, पण काही असेही अभ्यासक्रम आहेत, जे तुम्हाला कमी वेळेत चांगल्या नोकरीची संधी मिळवून देऊ शकतात. असाच एक लोकप्रिय आणि मागणी असलेला अभ्यासक्रम म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा’.

काय आहे हा डिप्लोमा आणि का आहे खास?

हा ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आहे, जो तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील मूलभूत आणि व्यावहारिक ज्ञान देतो. आजकाल आपण ज्या टेक्नॉलॉजीने वेढलेलो आहोत, जसे मोबाईल फोन, कॉम्प्युटर, इंटरनेट, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं, या सगळ्यांचा पाया इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये आहे. त्यामुळे या क्षेत्रातील Skilled लोकांना नेहमीच मागणी असते.

अंबाला येथील शासकीय पॉलिटेक्निक संस्थेचे प्राचार्य डॉ. राजीव सपरा यांच्या मते, त्यांच्या संस्थेत १९८८ पासून सुरू असलेला हा डिप्लोमा कोर्स विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, हा डिप्लोमा पूर्ण केल्यावर अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते. इतकंच नाही, तर ‘Make in India’ सारख्या उपक्रमांमुळे अनेकजण स्वतःचा व्यवसाय किंवा Startup सुरू करण्यासाठीही या ज्ञानाचा उपयोग करत आहेत.

मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी कशा?

पूर्वी अनेक Electronic वस्तू आणि Electronic Parts चीनसारख्या देशांमधून आयात केले जात होते. पण आता ‘Make in India’ मुळे भारतातच अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन वाढलं आहे. नोकिया, सॅमसंग, ॲपल सारख्या मोठ्या कंपन्या भारतात आपल्या Factories उभारत आहेत. या कंपन्यांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी, टेस्टिंगसाठी आणि देखभालीसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासते.

पात्रता काय आणि प्रवेश कसा मिळतो?

१०वी नंतर: ज्या विद्यार्थ्यांनी १०वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते या ३ वर्षांच्या डिप्लोमा कोर्ससाठी अर्ज करू शकतात. प्रवेश साधारणपणे १०वीच्या गुणांवर आधारित असतो.

१२वी नंतर: जर एखाद्या विद्यार्थ्याला १२वी नंतर हा डिप्लोमा करायचा असेल, तर काही संस्थांमध्ये त्याला आधी ITI करणं आवश्यक असू शकतं किंवा जर तो Non-Medical शाखेतील असेल, तर त्याला थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळण्याचीही शक्यता असते.

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना थिअरीसोबतच प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर जास्त भर दिला जातो, ज्यामुळे ते इंडस्ट्रीसाठी तयार होतात. चांगल्या संस्थांमधून हा कोर्स केल्यास कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळण्याची संधीही वाढते.

Follow Us
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...