AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, महावितरण विभागात तब्बल 150 जागांसाठी बंपर भरती

महावितरण विभागात मोठी बंपर भरती निघाली आहे. महावितरण विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 150 जागांसाठी होत आहे. यामुळे या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. देशाच्या कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, महावितरण विभागात तब्बल 150 जागांसाठी बंपर भरती
| Updated on: Dec 03, 2023 | 7:50 PM
Share

मुंबई : महावितरण विभागामध्ये काम करू इच्छिनाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे महावितरण विभागामध्ये मोठी बंपर भरती निघाली आहे. तब्बल 150 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. दहावी पास असणारे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ही केली जाईल. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. नोकरीचे ठिकाण हे औरंगाबाद असणार आहे. ही मोठी संधी दहावी पास असणाऱ्यांसाठी असणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबादकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. तब्बल 150 पदांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवार हा फक्त दहावीच पास चालणार नाहीये. दहावीसोबत उमेदवाराचे आयटीआय होणे तेवढेच महत्वाचे आहे. ही भरती प्रक्रिया 6 डिसेंबर 2023 पासून राबवली जाणार आहे. यामुळे उमेदवारांनी आताच तयारीला लागणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2023 आहे, त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज करणे आवश्यक आहे. यामुळे शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि अर्ज करा. ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. ही भरती विविध विभागांसाठी होतंय. वीजतंत्री ट्रेड, तारतंत्री ट्रेड आणि संगणक चालक या पदांसाठी होतंय.

तारतंत्री ट्रेड एकून पदसंख्या 65, वीजतंत्री ट्रेड एकून पदसंख्या 65, संगणक चालक एकून पदसंख्या 20 याप्रमाणे उमेदवाऱ्यांची निवड ही केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करताना याची काळजी घ्यावी की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या जागेसाठी करत आहोत. आयटीआय केलेल्या तरूणांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेत अर्ज करत असाल तर हे सर्वांत महत्वाचे आहे की, तुम्ही आयटीआय पास असणे आवश्यक आहे. www.apprenticeshipindia.org या साईटवर उमेदवाराची नोंदणे असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही पात्र ठरणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमची गुणपत्रिका अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....