AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : कुंपणानेच शेत खाल्लं, कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच कट रचत लुटले मालकाचे 75 लाख, अखेर…

लुटलेल्या रकमेपैकी 15 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून त्यासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी आणि एक शस्त्रही जप्त केले आहे असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai Crime : कुंपणानेच शेत खाल्लं,  कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच कट रचत लुटले मालकाचे 75 लाख, अखेर...
| Updated on: Sep 05, 2023 | 10:28 AM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : मालाडमध्ये गेल्या आठवड्यात चाकूचा धाक दाखवून 75 लाख रुपये लुटून पळून गेलेल्या 7 आरोपींना (7 arrested) अखेर अटक करण्यात आली आहे. मालाडच्या मार्वे रोडवरील एका फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीतून जमा झालेले 75 लाख रुपये लुटण्यात (robbingg cash) आले होते. या घटनेने शहरात खळबळ माजली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हा कंपनीचा कर्मचारीच असल्याचे समजते. पोलिसांनी आत्तापर्यंत 15 लाखांची कॅश जप्त केली असून या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा ते शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्टच्या रात्री मालाडमधील फॉरेक्स कंपनीचे दोन कर्मचारी , प्रतीक भोजाने आणि गणेश तळवळकर हे दोन बॅगांमधील असलेली 50 लाख आणि 25 लाखांची अशी एकूण 75 लाखांची रोकड घेऊन रिक्षातून जात होते. भाविक पटेल यांच्या मार्वे रोड येथील निवासस्थानी ही रोकड पोहोचवायची होती. मात्र ते पटेल यांच्या बिल्डींगजवळ पोहोचले असता, दुचाकीवरून तिघे जण आले. त्यापैकी दोघे खाली उतरले आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर ते लगेचच दुचाकीवरून फरार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

यानंतर भोजाने याने तातडीने त्यांच्या मालकाला फोन लावून घडलेली (लुटीची) घटना सांगितली. याच कंपनीतील पार्टनर असलेले धवल पांचाळ (वय 36) यांनी तातडीने मालाड पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर पैसे लुटणाऱ्या आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी विविध पथके तैनात केली. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे आणि निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तांत्रिक तपासातून मिळालेल्या लीड्सवर काम करणाऱ्या पथकांवर सुपरव्हिजन केली आणि अखेरीस लोणावळा, पुणे, नाशिक, रायगड, जालना आणि मुंबई येथून सात आरोपींना अटक करण्यात आली. धक्कादायाक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक हा कंपनीचाच कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. ज्याच्याकडून पैसे हिसकावण्यात आले तोच या लुटीत सहभागी होता, असेही समोर आल आहे.

अभय गायकवाड, त्याचा भाऊ कुणाल गायकवाड, नरेश राठोड, छगन गायकवाड, दिनेश इंद्रे, विनोद अचलखांब आणि प्रतीक भोजाने अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, प्रतीक भोजने यानेच आपल्या मालकाच्या कंपनीतील रोख रकमेची वाहतूक कशी होते, याची टीप इतर आरोपींना देत लुटीचा हा कट रचला होता. पोलिसांनी आरोपींकडून आत्तापर्यंत 15 लाखांची रोख रक्कम तसेच दोन बाईक्स आणि लुटीच्या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला चाकून जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, सध्या पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.