AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीराच्या प्रेमात पडली वहिनी! प्रेमाने बेडरुममध्ये बोलावलं, म्हणाली ‘पतीला बाजूला…’ नंतर जे घडलं सर्वांनाच धक्का बसला

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वहिनी दिराच्या प्रेमात पडली आणि नंतर जे घडलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला...

दीराच्या प्रेमात पडली वहिनी! प्रेमाने बेडरुममध्ये बोलावलं, म्हणाली 'पतीला बाजूला...' नंतर जे घडलं सर्वांनाच धक्का बसला
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 20, 2025 | 3:06 PM
Share

जेव्हा कोणाला कोणावर तरी प्रेम होतं, तेव्हा तो मोठा-लहान काहीच पाहिल जात नाही. आता कलियुग इतके पुढे गेले आहे की, प्रेमाच्या नावाखाली नातीही उद्ध्वस्त होतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यातील गंगीरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. येथे एक वहिनी तिच्या दिराच्या प्रेमात पडली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. मग काय, महिलेला आपला पती डोळ्यांना खुपायला लागला आणि त्याला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. एके दिवशी तिने दिराला बोलावले आणि म्हणाली, “ऐक, पतीला रस्त्यातून हटवणे गरजेचे आहे.” त्यानंतर दोघांनी मिळून त्या बिचाऱ्या माणसाचा जीव घेतला. चला, हा सगळा प्रकार सविस्तर जाणून घेऊया…

काय घडले होते?

ही घटना नगला हिमाचल गावातील आहे, जिथे 30 वर्षीय ट्रक ड्रायव्हर ऋषी कुमार याची 17 जूनच्या रात्री गोळी मारून हत्या करण्यात आली. 18 जूनच्या सकाळी ऋषी कुमार याचा मृतदेह गावात त्याच्या चुलत भावाच्या घरापासून काही अंतरावर आढळला. मृतदेहाच्या कानाजवळ गोळी मारलेली होती आणि त्याच्या अंगावर अंगोछा गुंडाळलेला होता. सुरुवातीला पत्नी ललिताने आरोप केला होता की, गावातील एका व्यक्तीने मोबाइल चोरीच्या संशयावरून ऋषीला धमकी दिली होती आणि त्याच रागातून त्याची हत्या केली.

वाचा: सर्वांसमोर बॉयफ्रेंड राजला मोठी मारून ढसाढसा रडली होती सोनम, राजा रघुवंशी प्रकरणातील तो व्हिडीओ लक्षवेधणारा

पोलीस तपासात खुलासा

तपासादरम्यान पोलिसांना ललिताच्या बोलण्यावर संशय आला. चौकशीत समोर आले की, ललिताचे लग्नापूर्वीच ऋषीच्या चुलत भावाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे संबंध सुरूच होते आणि याची माहिती ऋषीलाही झाली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ललिता आणि तिचा प्रियकर (जो ऋषीचा चुलत भाऊ आहे) यांनी मिळून ऋषीच्या हत्येचा कट रचला आणि त्याला प्रत्यक्षात आणला.

हत्येच्या रात्रीचे सत्य

ललिताने सांगितले की, त्यांच्या घरी शौचालय नाही. 17 जूनच्या रात्री तिला जुलाबाचा त्रास होत होता, म्हणून तिचा पती तिला रात्री 11:30 वाजता चुलत भावाच्या घरी सोडायला गेला. ती आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन गेली होती. तिथूनच हत्येचा कट रचला गेला आणि त्याला अंजाम देण्यात आला.

कुटुंबाची परिस्थिती

ऋषी हा तीन भावांमध्ये सर्वात मोठा होता आणि ट्रक ड्रायव्हर होता. त्याचे आई-वडील याआधीच वारले होते. त्याच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. तो हरियाणामध्ये काम करत होता आणि चुलत भावाच्या लग्नासाठी गावी आला होता. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, अवैध संबंधच हत्येचे कारण ठरले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच सर्व दोषींना पकडण्याचा दावा करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.