AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये 400 पोलिसांकडून धडक कारवाई, 27 गावठी कट्टे जप्त, 106 आरोपींना अटक

पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर धडक कारवाई केलीय. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही मोहीम राबवली.

अहमदनगरमध्ये 400 पोलिसांकडून धडक कारवाई, 27 गावठी कट्टे जप्त, 106 आरोपींना अटक
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 29, 2021 | 8:53 PM
Share

अहमदनगर : पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर धडक कारवाई केलीय. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही मोहीम राबवली. या मोहीम अंतर्गत 90 ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेण्यात आली. यात 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे तसेच 3 तलवारी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी 13 गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या मोहिमे अंतर्गत नेवासा, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यात शोध घेण्यात आला.

अहमदनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 27 गावठी कट्टे जप्त केले आहेत. तसेच 106 आरोपींना अटक केली आहे. या कारवायानंतर 36 गुन्हे दाखल करण्यात आलेत.

श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यातील 81 सराईत गुन्हेगारांची माहिती संकलन

अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये गुन्हेगारांकडून वारंवार गावठी कट्ट्याचा वापर होत होता. प्रामुख्याने जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहूरी या तालुक्यामध्ये गावठी कट्टयांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली. यानंतर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यातील 81 सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व नियंत्रण कक्ष तथा पोलीस उपअधिक्षक मुख्यालयाचे पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांनी ही कारवाई केली.

जिल्ह्यातील 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 350 पोलीस अमलदारांचा कारवाईत सहभाग

त्यांच्यासोबत पोलीस निरिक्षक रणजित डेरे, पोलीस निरिक्षक मसूद खान, पोलीस निरिक्षक विजय करे, पोलीस निरिक्षक संजय सानप, पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र करपे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन बागूल, पोसई गणेश इंगळे आदींसह जिल्ह्यातील 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 350 पोलीस अमलदार यांचा या कारवाईत सहभाग होता. या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

VIDEO : पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा माज? तरुणाला मरेपर्यंत मारलं, नंतर फेकून दिलं, मारहाणीचा व्हिडीओ समोर

कुख्यात गुंडाचा जामीन अर्ज फेटाळला म्हणून न्यायाधीशाची हत्या? झारखंडचं संतापजनक प्रकरण, सीसीटीव्ही फुटेजमुळे कृत्य उघड

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा थेट सवाल

व्हिडीओ पाहा :

Ahmednagar Police action on illegal weapons in district

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली