AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातावर त्रिशुल आणि ओमचा टॅटू, सुमद्रकिनारी आढळलेला ‘तो’ शीर नसलेला मृतदेह कुणाचा?

समुद्र किनाऱ्यावर सकाळी एक बॅग वाहून आली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बॅग उघडून पाहिली तर आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

हातावर त्रिशुल आणि ओमचा टॅटू, सुमद्रकिनारी आढळलेला 'तो' शीर नसलेला मृतदेह कुणाचा?
भाईंदर समुद्र किनारी महिलेचा मृतदेह आढळलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2023 | 4:16 PM
Share

भाईंदर : समुद्र किनाऱ्यावर शीर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळला. एल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा मुंडकं नसलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत, पुढील तपास सुरू केला. मृत तरुणीच्या हातावर त्रिशूल आणि ओमचा टॅटू बनवला आहे. मृत तरुणीचे वय 25 ते 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदक करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु

मृतदेह असलेली बॅग पाण्यात वाहून आलेली असून, नेमकी कुठून आली आहे याचा तपास पोलीस घेत आहेत. महिलेच्या हत्येमागील कारण काय?, हत्या कोणी आणि कुठे केली? याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. लवकरात लवकर हत्या करणाऱ्याचा शोध घेतला जाईल, असे उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वपोनी कारंडे यांनी सांगितले. दरम्यान, कुणाच्या कुटुंबातील 25 ते 30 वर्षीय महिला मिसिंग असल्यास त्यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा, असे आवाहन देखील उत्तन सागरी पोलिसांच्या मार्फत करण्यात आले आहे.

जुन्नरमध्ये डोंगरावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

जुन्नर तालुक्यातील बेल्हेजवळील पेमदरा येथे डोंगरावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. प्रकरणाची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सध्या आळेफाटा पोलिसांकडून सुरू आहे. व्यक्तीची हत्या कोणी केली याबाबत आळेफाटा पोलीस तपास करत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.