AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर पतीला दिलं दूध, बेशुद्ध झाल्यावर नववधूने जे कांड केलं…

लग्नानंतर सगळं छान होतं, नववधू बनलेली वंदना पीडित पुष्पकांत याच्या घरी आली. दोन दिवस सर्व काही ठीक होते, पण त्यानंतर जे घडले त्यामुळे पुष्पकांतच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसला.

लग्नानंतर पतीला दिलं दूध, बेशुद्ध झाल्यावर नववधूने जे कांड केलं...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 24, 2025 | 1:47 PM
Share

राजस्थानमधील अबुरोड येथील रीको पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लुटेरी दुल्हन या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी प्रथम एखाद्या व्यक्तीला आपला बळी बनवायची आणि नंतर त्याचे लग्न स्वतःच्या टोळीतील महिलेशी लावून द्यायची. पण लग्नानंतर एक-दोन दिवसांनी ती महिला कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात आणि दुधात मादक पदार्थ मिसळायची, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य बेशुद्ध व्हायचे. यानंतर, ती महिला घरात असलेल्या मौल्यवान वस्तू लुटून फरार व्हायची.

पोलिसांनी दिलेल्या माहिताीनुसार, 14 एप्रिल रोजी देखील अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले. संतपूर येथील पुष्पकांत उपाध्याय नावाच्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला लग्नाच्या नावाखाली शिवगंज येथे बोलावण्यात आले. जिथे वंदना पटेल, अन्वर, शांती आणि इतर लोकं त्याला भेटले. यानंतर त्यांनी अडीच लाख रुपये घेऊन पुष्पकांतचे लग्न उत्तर प्रदेशातील रहिवासी वंदना पटेलशी एका मंदिरात लावून दिलं.

जेवणात मिसळलं नशेचं औषध

लग्नानंतर सगळं छान होतं, नववधू बनलेली वंदना पीडित पुष्पकांत याच्या घरी आली. दोन दिवस सर्व काही ठीक होते, पण त्यानंतर जे घडले त्यामुळे पुष्पकांतच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसला. खरं तर, तिसऱ्या दिवशी, 17 एप्रिलच्या रात्री, वंदनाने अन्न आणि दुधात मादक पदार्थ मिसळले आणि ते वराला आणि त्याच्या आईला खायला दिले, ते खाऊन दोघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर संधी मिळताच वंदना पटेलने घरातील सर्व मौल्यवान वस्तू, पैसे, आणि बाकीचा ऐवज लुटला आणि पळून गेली. बेशुद्ध झालेला नवरा मुलगा आणि त्याची आई या दोघांवर पालनपूर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

इतर गुन्ह्यांचीही शंका

यानंतर पीडित इसम पुष्पकांत याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील चौकशीनंतर उत्तर प्रदेशातील रहिवासी अन्वर फकीर, शांती देवी सेन आणि वंदना पटेल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. हे सर्व आरोपी गुन्ह्यांच्या इतर घटनांमध्येही सामील असू शकतात अशी शंका व्यक्त होत आहे.

Follow Us
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.