AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?

सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्या होत्या | Sachin Vaze Riyaz Kazi

सचिन वाझे चेकमेट,  CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?
रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते.
| Updated on: Mar 18, 2021 | 4:22 PM
Share

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे API सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण आता सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील (CIU) अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Riyaz Kazi would be NIA witness in Mansukh Hiren death case)

रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होती. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्या होत्या. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीची सीसीटीव्ही फुटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती आहे. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांचा कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.

रियाझ काझी आणि API होवाळे ‘एनआयए’च्या रडारवर

सचिन वाझे यांना ताब्यात घेतल्यावर NIA ने लगेच रियाझ काझी यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. त्यांनी सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलवण्यात आले. या तिन्ही दिवशी त्यांची जवळपास 10 तास चौकशी झाली होती. मात्र, गुरुवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. आतापर्यंतच्या चौकशीत रियाझ काझी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून केलेल्या गोष्टींची कबुली रियाझ काझी यांनी दिली आहे. हा सगळा घटनाक्रमक पाहता याप्रकरणात रियाझ काझी माफीचे साक्षीदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘सचिन वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, त्यांची हत्या होऊ शकते’

सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे (Sachin Vaze) यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

संबंधित बातम्या:

Sachin Vaze : गुन्ह्यात वापरलेला दुसरा शर्टही मिळाला, जिथे शर्ट जाळला, तिथे नेऊन वाझेंची चौकशी

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

‘सचिन वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, त्यांची हत्या होऊ शकते; मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा’

(Riyaz Kazi would be NIA witness in Mansukh Hiren death case)

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.