AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रूरतेचा कळस! चाळीस वेळा चावला, नवऱ्यानंच अंकिताचा जीव घेतला

अंकिता बाळाचे कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली असताना पाय घसरुन जिन्यावरुन खाली पडली आणि जखमी झाली, असं सागरने पोलिसांना सांगितलं. मात्र पोस्टमार्टमवेळी अंकिताच्या शरीरावर 40 हून अधिक जखमा आढळल्या

क्रूरतेचा कळस! चाळीस वेळा चावला, नवऱ्यानंच अंकिताचा जीव घेतला
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 17, 2021 | 12:18 PM
Share

पणजी : 29 वर्षीय पत्नीची हत्या केल्याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील रावणफोंड-मडगाव येथील रहिवासी सागर तिंबाडिया याला मडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मयत अंकिताच्या मृतदेहावर चाळीसहून अधिक जखमा आढळल्या असून शरीरावर चावल्याचे व्रण असल्याचेही पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघडकीस आले आहे. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच अंकिताचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गूढ निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकरण?

रावणफोंड-मडगाव भागातील नालंदा अपार्टमेंटमध्ये सागर आणि अंकिता तिंबाडिया हे दाम्पत्य राहत होते. नऊ डिसेंबरला मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास अंकिताला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ती अत्यवस्थ होती. डॉक्टरांनी तपासणी करुन तिाल मृत घोषित केले.

अंकिताच्या शरीरावर 40 हून अधिक जखमा

अंकिता बाळाचे कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली असताना पाय घसरुन जिन्यावरुन खाली पडली आणि जखमी झाली, असं सागरने पोलिसांना सांगितलं. मात्र पोस्टमार्टमवेळी अंकिताच्या शरीरावर 40 हून अधिक जखमा आढळल्या. तसंच तिच्या शरीरावर चावा घेतल्याचे व्रणही आढळले. त्यामुळे शारीरिक छळानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला.

संशयित पती सागर तिंबाडिया मूळ गुजरातमधील बगासरा येथील आहे. त्याचा सिरॅमिक टाईल्सचा व्यवसाय आहे. तो सध्या मडगावमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वीच तो गुजरातला जाऊन आला होता.

अंकिताला बिल्डिंगवरुन ढकलून देण्याची धमकी

अंकिता ही सागरची दुसरी पत्नी आहे. याआधी सागरने अंकिताला बिल्डिंगवरुन ढकलून देण्याची धमकी दिली होती, असा दावा अंकिताच्या भावाने केल्याचं पोलिसांनी सांगितलं. लग्नानंतर केवळ दोनच वर्षांत अंकिताचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. गुरुवारी सकाळी सागरला अटक केली असून अधिक तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

Aurangabad Suicide | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

सावत्र बापानं सांगितलं मुलगा कोरोनानं गेला, इकडे कॉलनीतल्या तरुणांना काय दिसलं?

अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस