AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमपीएससीतील अपयशानंतर वकिलीचं शिक्षण; पण वडिलांनीच उच्च शिक्षित मुलाला…, कारण काय?

तो उच्चशिक्षित होता. दहा वर्षे एमपीएससीसाठी प्रयत्न करुनही त्याला यश आले नाही. अखेर त्याने कोल्हापुरात येऊन वकिलीचं शिक्षण सुरु केलं. पण अचानक वडिलच त्याच्या जीवावर उठल्याने एकच खळबळ उडाली.

एमपीएससीतील अपयशानंतर वकिलीचं शिक्षण; पण वडिलांनीच उच्च शिक्षित मुलाला..., कारण काय?
घरगुती वादातून बापाने मुलाला संपवलेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2023 | 5:30 PM
Share

कोल्हापूर : घरगुती कारणातून पित्यानेच आपल्या उच्चशिक्षित तरुण मुलाची हत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अमरसिंह थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत ही हत्येची घटना घडली. पोलिसांनी 24 तासात तरुणाच्या हत्येचा छडा लावला. हत्येचे कारण उघड होताच सर्वांनाच धक्का बसला. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिल आणि भावाने तरुणाची हत्या केली. कोल्हापूर एलसीबीनं दोघा आरोपींना अटक केली आहे. थोरात कुटुंबीय हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे रहिवासी आहेत. वडील दत्ताजीराव थोरात आणि भाऊ अभिजित थोरात यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आयफोनसाठी पैसे मागितल्याने वादातून हत्या

मयत अमरसिंह थोरात दहा वर्ष पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत होता. त्यानंतर घरातून त्याचा अभ्यास सुरू होता. मात्र यश न आल्याने कोल्हापुरात त्याने वकिलीचं शिक्षण सुरू केले. दरम्यान अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने घरात वारंवार भांडणं होत होती. तसेच अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाखांची मागणी केली होती. मात्र वडिलांनी नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. याच रागातून वडिलांनी घरात अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. यामुळे अमरसिंहला प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वडील आणि भावाला अटक

मुलाचा मृत्यू झाल्याने घाबरून वडिल आणि भावाने मृतदेह रस्त्याच्या शेजारी टाकला. रस्त्याच्या शेजारी मृतदेह पडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तपास सुरु करत मृतदेहाची ओळख पटवली. घरगुती कारणातून वडिल आणि भावानेच तरुणाची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी वडील आणि भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.