AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणीशी बोलणं खटकलं, मग त्याने थेट तरुणाला…, नेमकं काय घडलं?

हल्ली कशावरुन कोण कोणाची ह्त्या करेल सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना उपराजधानीत उघडकीस आली आहे.

मैत्रिणीशी बोलणं खटकलं, मग त्याने थेट तरुणाला..., नेमकं काय घडलं?
नागपुरमध्ये क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 30, 2023 | 3:35 PM
Share

नागपूर : उपराजधानीतही हत्यासत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. किरकोळ कारणातून जीव घेण्याच्या घटना वाढत आहेत. आज पुन्हा एकदा घटनेने नागपूर हादरलं आहे. मैत्रिणीशी बोलल्याच्या कारणातून एका 21 तरुणाची हत्या केल्याची घटना नागपुरातील जरीपटका परिसरात घडली. श्रेयांश शैलेश पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. या हत्याकांडात चार ते पाच आरोपींचा समावेश असून, हत्या केल्यानंतर सर्वजण फरार झाले आहेत. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा घेत शोध आहेत.

धारदार शस्त्राने वार करुन श्रेयांशची हत्या

जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रावस्ती नगरातील बौद्ध विहारजवळ 21 वर्षीय श्रेयांश पाटील याच्यावर चार ते अज्ञात मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला. लाथा बुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने वार केला. गंभीर जखमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन श्रेयांशचा मृत्यू झाला. श्रेयस हा एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्यामुळे त्याच्या खून करण्यामागे नेमकं काय उद्देश याचा शोध सध्या जरीपटका पोलीस घेत आहे. तसेच पोलीस मारेकऱ्यांचाही शोध घेत आहे.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

मुख्य आरोपीच्या मैत्रिणीसोबत बोलल्याने श्रेयांशची हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र पोलिसी तपासात सत्य समोर येईल. प्राथमिक तपासात पोलिसांना मारेकऱ्यांचे घटनास्थळातील परिसरातून जाताना पाठमोरे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. या हत्येमागे श्रेयांशचा कुणासोबत काही वाद होता का? याचीही चौकसी पोलीस करत आहेत. सीसीटीव्हीत खून करणारे हे युवक असल्याचं दिसून, त्यांचा मागावर शोध पथक रवाना झाले आहे.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.