AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिरजोर चोरट्यांची दसऱ्यादिवशी सलामी; गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून नाशिकमध्ये 23 लाखांची धाडसी चोरी

गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून तब्बल 22 लाख 71 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सिन्नरमधल्या सरदवाडीत (जि. नाशिक) मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शिरजोर चोरट्यांची दसऱ्यादिवशी सलामी; गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून नाशिकमध्ये 23 लाखांची धाडसी चोरी
सिन्नर येथील एटीएम चोरीचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 10:43 AM
Share

नाशिकः गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून तब्बल 22 लाख 71 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सिन्नरमधल्या सरदवाडीत (जि. नाशिक) मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या धाडसी चोरीबाबतची माहिती अशी की, सिन्नरमधल्या सरदवाडी येथे हॉटेल अजिंक्यताराजवळ अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी या एटीमची फोडी केली. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला. आपण कुणाच्याही जाळ्यात सापडू नये म्हणून सीसीटीव्हीचे केबल कनेक्शन तोडून टाकले. त्यानंतर सोबत असलेल्या गॅस कटर मशीनने एटीएमचे तुकडे केले. शटर बंद करून चोरट्यांनी डाव साधला. रोकड लंपास केल्यानंतरही शटर बंद ठेवले. दसऱ्यादिवशी दुपारपर्यंत एटीएमचे शटर बंदच होते. मात्र, शुक्रवारी दसरा सणानिमित्त पैसे काढायचे म्हणून अनेक ग्राहक तिथे येऊन गेले. एक ग्राहक बराच वेळ थांबला. त्याने शटर वर करून पाहिले. तेव्हा एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार, सोमनाथ तांबे, संतोष मुटुकुळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

…अन् काही पुरावे सोडले

चोरट्यांनी मोठ्या करामतीने शटर बंद करून एटीएम कापले. आपण सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून केबल कनेक्शन तोडले. मात्र, त्यांचे काही ठसे एटीएममध्ये उमटले होते. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना बोलावून या ठशांचे नमुने घेतले आहेत. सोबतच सीसीटीव्हीची हार्ड डिस्कचीत तपासणीही सुरू केली आहे.

सुरक्षारक्षक होता कुठे?

जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रत्येक एटीएमवर सुरक्षारक्षक शक्यतो तैनात केलेला असतो. ही घटना मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. मग या काळात एटीएमवरील सुरक्षारक्षक कुठे होता. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही एटीएमचे शटर बंद होते. मग सकाळीही सुरक्षारक्षक नव्हता की, येथे सुरक्षारक्षकच नेमलेला नव्हता, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलीस तपासात हे सारे समोर येईलच.

इतर बातम्याः

सप्तश्रृंगी गडावर 500 वर्षांची परंपरा; 4600 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री लावला कीर्तीध्वज, जाणून घ्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा!

ऐन सणात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला; पावणेदोन लाख हेक्टरवरचे पीक पाण्यात, नाशिकसाठी 147 कोटींची मागणी

हिंदू ही एकच जात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांचा लासलगावमध्ये दावा

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.