AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपडीत लिव्ह इन पार्टनरसोबत राहात होता, मध्यरात्री कोणी तरी झोपडीच पेटवली! काळीज पिळवटून टाकणारी घटना

एक धक्कादायक प्रकरण आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून एका झोपडीत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एक कपलला जिवंत जाळण्यात आले आहे. दोघे गाढ झोपेत असताना कोणी तरी मध्यरात्री त्यांच्या झोपडीला आग लावली. आता नेमकं काय घडलं वाचा...

झोपडीत लिव्ह इन पार्टनरसोबत राहात होता, मध्यरात्री कोणी तरी झोपडीच पेटवली! काळीज पिळवटून टाकणारी घटना
HutImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 03, 2026 | 1:15 PM
Share

छोट्या गावात एक असे भयानक दृश्य समोर आले, ज्याने संपूर्ण परिसर हादरला. दोन जीवांच्या आयुष्याची शेवटची आशा असलेली एक छोटीशी झोपडी आता राखेच्या ढीगात बदलली होती. त्या राखेमध्येच ५३ वर्षीय शेतकरी पी. शक्तिवेल आणि त्यांची ४० वर्षीय लिव्ह-इन पार्टनर एस. अमृतम यांचे जळालेले मृतदेह सापडले. झोपडीचा दरवाजा बाहेरून बंद करून त्याला आग लावण्यात आली होती, ज्यात दोघेही जळून मृत्यूमुखी पडले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील चेंगमजवळील पक्किरिपालयम या गावात शुक्रवारी पहाटे घडली. गावकऱ्यांची झोप जळालेल्या वस्तूंच्या तीव्र दुर्गंधीने उडाली. लोक शेताकडे धावले तेव्हा त्यांना तेथील छोटीशी झोपडी पूर्णपणे जळून खाक झालेली दिसली. बातमी मिळताच चेंगम पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह इतके जळाले होते की ओळख पटवणे कठीण झाले होते. फॉरेन्सिक टीम बोलावण्यात आली, स्निफर डॉगच्या मदतीने तपास करण्यात आला आणि घटनास्थळीच पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तीन वर्षांपासून दोघे एकत्र राहत होते

शक्तिवेल आणि अमृतम या दोघांचे आयुष्य आधीच अनेक संकटांतून होते. शक्तिवेल तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून वेगळे झाले होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे, जी आता आईसोबत बंगळुरूत राहतात. अमृतमही आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहत होत्या आणि त्यांनाही तीन मुले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांचा आधार बनले होते आणि गावाबाहेर शेतात बांधलेल्या छोट्या झोपडीत एकत्र राहत होते.

शक्तिवेलला भेटायला मुलगी आली होती

गुरुवारी रात्री शक्तिवेलची मुलगी त्यांना भेटायला आली होती. त्यांच्यासोबत जेवण केले आणि रात्री साधारण नऊ वाजता परत गेली. कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची शेवटची भेट ठरणार होती. रात्रीच्या शांततेत कोणीतरी झोपडीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि आग लावून दिली. दोन जीवांना ओरडण्याएवढी संधीही मिळाली नाही आणि सर्व काही शांततेत संपले. चेंगम पोलिसांनी दोघांच्या मृत्यूला संशयास्पद मानून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, ज्यात दोघांच्या पूर्वायुष्यातील नातेसंबंधांची भूमिकाही तपासली जात आहे. ही घटना फक्त दोन लोकांच्या हत्येची नाही, तर त्या समाजासाठीही एक प्रश्न आहे, जिथे तुटलेल्या नात्यांनंतर नवे आयुष्य सुरू करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना इतक्या निर्घृणपणे संपवून टाकले जाते.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय