AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपडीत लिव्ह इन पार्टनरसोबत राहात होता, मध्यरात्री कोणी तरी झोपडीच पेटवली! काळीज पिळवटून टाकणारी घटना

एक धक्कादायक प्रकरण आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून एका झोपडीत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एक कपलला जिवंत जाळण्यात आले आहे. दोघे गाढ झोपेत असताना कोणी तरी मध्यरात्री त्यांच्या झोपडीला आग लावली. आता नेमकं काय घडलं वाचा...

झोपडीत लिव्ह इन पार्टनरसोबत राहात होता, मध्यरात्री कोणी तरी झोपडीच पेटवली! काळीज पिळवटून टाकणारी घटना
HutImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 03, 2026 | 1:15 PM
Share

छोट्या गावात एक असे भयानक दृश्य समोर आले, ज्याने संपूर्ण परिसर हादरला. दोन जीवांच्या आयुष्याची शेवटची आशा असलेली एक छोटीशी झोपडी आता राखेच्या ढीगात बदलली होती. त्या राखेमध्येच ५३ वर्षीय शेतकरी पी. शक्तिवेल आणि त्यांची ४० वर्षीय लिव्ह-इन पार्टनर एस. अमृतम यांचे जळालेले मृतदेह सापडले. झोपडीचा दरवाजा बाहेरून बंद करून त्याला आग लावण्यात आली होती, ज्यात दोघेही जळून मृत्यूमुखी पडले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील चेंगमजवळील पक्किरिपालयम या गावात शुक्रवारी पहाटे घडली. गावकऱ्यांची झोप जळालेल्या वस्तूंच्या तीव्र दुर्गंधीने उडाली. लोक शेताकडे धावले तेव्हा त्यांना तेथील छोटीशी झोपडी पूर्णपणे जळून खाक झालेली दिसली. बातमी मिळताच चेंगम पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह इतके जळाले होते की ओळख पटवणे कठीण झाले होते. फॉरेन्सिक टीम बोलावण्यात आली, स्निफर डॉगच्या मदतीने तपास करण्यात आला आणि घटनास्थळीच पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तीन वर्षांपासून दोघे एकत्र राहत होते

शक्तिवेल आणि अमृतम या दोघांचे आयुष्य आधीच अनेक संकटांतून होते. शक्तिवेल तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून वेगळे झाले होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे, जी आता आईसोबत बंगळुरूत राहतात. अमृतमही आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहत होत्या आणि त्यांनाही तीन मुले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांचा आधार बनले होते आणि गावाबाहेर शेतात बांधलेल्या छोट्या झोपडीत एकत्र राहत होते.

शक्तिवेलला भेटायला मुलगी आली होती

गुरुवारी रात्री शक्तिवेलची मुलगी त्यांना भेटायला आली होती. त्यांच्यासोबत जेवण केले आणि रात्री साधारण नऊ वाजता परत गेली. कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची शेवटची भेट ठरणार होती. रात्रीच्या शांततेत कोणीतरी झोपडीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि आग लावून दिली. दोन जीवांना ओरडण्याएवढी संधीही मिळाली नाही आणि सर्व काही शांततेत संपले. चेंगम पोलिसांनी दोघांच्या मृत्यूला संशयास्पद मानून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, ज्यात दोघांच्या पूर्वायुष्यातील नातेसंबंधांची भूमिकाही तपासली जात आहे. ही घटना फक्त दोन लोकांच्या हत्येची नाही, तर त्या समाजासाठीही एक प्रश्न आहे, जिथे तुटलेल्या नात्यांनंतर नवे आयुष्य सुरू करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना इतक्या निर्घृणपणे संपवून टाकले जाते.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.