AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाक युद्धात सहभागी नांदेडच्या माजी सैनिकाचा खून, मुलगा-सून-नातवाने संपवलं

विजयने वडिलांना बुक्क्या आणि दगडाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.

भारत-पाक युद्धात सहभागी नांदेडच्या माजी सैनिकाचा खून, मुलगा-सून-नातवाने संपवलं
नांदेडच्या सेवानिवृत्त सैनिकाची हत्या
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 07, 2021 | 1:36 PM
Share

नांदेड : काही गोष्टींपुढे सगळी नाती फिकी पडतात. असाच काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात समोर आला आहे. लहुजी नगर येथे राहणारे माजी सैनिक नारायणराव साबळे यांना जन्मदात्या मुलाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणराव साबळे यांनी 1965 ते 1971 या काळात झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला होता.

काय आहे प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात लहुजी नगर येथे सेवानिवृत्त माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे राहत होते. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मुलगा विजय साबळे (वय 45 वर्ष) यांनी वडिलांना मारहाण केली. विजयची 40 वर्षीय पत्नी आणि 18 वर्षांचा मुलगा शुभम विजय साबळे यांनीही मारहाणीत मदत केली.

नेमकं काय घडलं?

विजयने वडिलांना बुक्क्या आणि दगडाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि पत्नी गयाबाई यांनी अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.

तिघा जणांवर हत्येचा गुन्हा

सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विजय नारायणराव साबळे, शुभम विजय साबळे, सौ. साबळे या तिघा जणांच्या विरूद्ध कलम 302, 323, 504, 506, 34 भादंवि प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

1965 – 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग

1965 – 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांचा सहभाग होता. या युद्धामध्ये त्यांच्या मांडीला एक गोळी लागली होती यामुळे त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आले होते.

संबंधित बातम्या :

नालासोपाऱ्यात 80 वर्षीय महिलेची हत्या, भाऊबीजेलाच वृद्धेला राहत्या घरी कोणी संपवलं?

CCTV | पाण्याच्या बहाण्याने वॉचमन घरात शिरला, वृद्धेला बांधून दरोडा, पाडव्याला उल्हासनगरात खळबळ

शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक