AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिराच्या रखवालदार दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, वाशिममध्ये खळबळ

वाशिम जिल्ह्याच्या डव्हा येथील हे दाम्पत्य रहिवासी असून, गजानन निंबाळकर (वय 60) आणि निर्मला निंबाळकर -देशमुख (वय 55) अशी हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. निंबाळकर दाम्पत्य हे गेल्या अनेक वर्षांपासून चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते.

मंदिराच्या रखवालदार दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, वाशिममध्ये खळबळ
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 20, 2021 | 2:42 PM
Share

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ प्रकल्प परिसरात रखवालदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने वार करून या वयोवृद्ध रखलवालदाराची भर दुपारी हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोण होते दाम्पत्य

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्याच्या डव्हा येथील हे दाम्पत्य रहिवासी असून, गजानन निंबाळकर (वय 60) आणि निर्मला निंबाळकर -देशमुख (वय 55) अशी हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. निंबाळकर दाम्पत्य हे गेल्या अनेक वर्षांपासून चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते.

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारात अज्ञात हल्लेखोर ते राहत असलेल्या घरात शिरले आणि त्यांनी भीषण हल्ला चढवला. हल्लेखोरांनी गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर यांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली.

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

धक्कादायक म्हणजे, भर दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घराचे दार उघडे असल्याचे पाहून स्थानिकांनी निंबाळकर यांची विचारपूस करण्यासाठी गेले असता दोघांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

हत्येचं कारण अस्पष्ट

पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. रखवालदार असलेल्या निंबाळकर वृद्ध दाम्पत्याची हत्या का आणि कशासाठी करण्यात आली असावी, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. पंचनामा करून दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

या वृद्ध दाम्पत्याची हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका पोलीस श्वान पथकाच्या मदतीने पुढील तपास करीत आहेत. या दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणी कुऱ्हाड मिळून आली असून, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरूअसून, लवकरच तपास करून माहिती देणार असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितलं.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये वहिनीची चाकूने वार करुन हत्या केल्याच्या आरोपाखाली दीराला अटक करण्यात आली आहे. मुरादाबाद शहर पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी याविषयी माहिती दिली. कटघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी इम्रानची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

शनिवारी संध्याकाळी इम्रानने त्याची वहिनी प्रवीणची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे, असं पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी सांगितलं. मृत विवाहिता प्रवीणचे पती परवेज यांनी सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सदस्य तळ मजल्यावर नमाज पठण करत होते. तर त्यांची पत्नी प्रवीण पहिल्या मजल्यावर होती. 37 वर्षीय महिला चार मुलांची आई होती.

संबंधित बातम्या :

वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?