AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : प्रियकराशी लग्न करुन सेटल होण्यासाठी पैसा नव्हता; तरुणीने केलेला शेवटचा गुन्हा शेवटचाच ठरला !

शलाका ही अट्टल गुन्हेगार आहे. मात्र तिला आता गुन्हेगारी सोडून प्रियकराशी लग्न करुन नवीन जीवन सुरु करायचे होते. लग्नानंतर शलाका पतीसोबत नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. यासाठी तिला पैशांची गरज होती.

Mumbai Crime : प्रियकराशी लग्न करुन सेटल होण्यासाठी पैसा नव्हता; तरुणीने केलेला शेवटचा गुन्हा शेवटचाच ठरला !
गरजू तरुणीला लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगार तरुणीला अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 14, 2023 | 11:01 PM
Share

मुंबई : मुंबईत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका गुन्हेगार तरुणीने आपल्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी शेवटचा गुन्हा करण्याचे ठरवले. यात ती यशस्वीही झाली पण अखेर शेवटचा गुन्हा खरोखरच शेवटचा ठरला. बोरिवली जीआरपी पोलिसांनी तरुणीला गोव्यातील रेस्टॉरंटमधून अटक केली. शलाका सुरेश गवस असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणीचे नाव आहे. तरुणीवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तरुणीने केलेल्या शेवटच्या गुन्ह्यातील चोरीचा कॅमेरा जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

शलाका ही अट्टल गुन्हेगार आहे. मात्र तिला आता गुन्हेगारी सोडून प्रियकराशी लग्न करुन नवीन जीवन सुरु करायचे होते. लग्नानंतर शलाका पतीसोबत नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. यासाठी तिला पैशांची गरज होती.

यातूनच तिने पैसे मिळवण्यासाठी शेवटचा गुन्हा करुन पैसे मिळवायचे आणि गोव्यात प्रियकरासोबत सेटल व्हायचे ठरवले होते. यासाठी ती प्रयत्नात असतानाच तिची पीडितेशी गाठ पडली.

पीडित मुलगी ही नोकरीच्या शोधात होती. नोकरीच्या शोधात असतानाच तिची कुणाच्या ओळखीतून आरोपी तरुणीशी ओळख झाली. तरुणीने पीडितेला मालाड स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले होते.

महिलेने पीडितेला सांगितले की, तुला नोकरी मिळू शकते पण त्यापूर्वी कॅमेरा आवश्यक असेल. पीडितेने नोकरी मिळवण्यासाठी पवई येथून कॅनन कंपनीचा कॅमेरा घेतला होता. ज्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.

पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला

दोघी पुन्हा एकदा मालाड स्थानकात भेटल्या आणि पीडितेने कॅमेरा आोरपी तरुणीला दिला. दुसऱ्या दिवशी पीडितेला भेटू असे सांगून तरुणी स्टेशनवरून निघून गेली. दुसऱ्या दिवशी पीडित महिला मालाड स्थानकावर आली आणि तरुणीला फोन करू लागली, पण महिलेचा फोन बंद होता.

यानंतर पाडितेने बोरीवली जीआरपी पोलिसात तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर बोरीवली पोलिसांनी तरुणीचा शोध सुरु केला. तरुणीचा शोध घेत पोलीस गोव्यात दाखल झाले.

पोलिसांनी गोव्यातून तरुणीला अटक केले

बोरीवली जीआरपी पोलिसांनी गोव्यातील एका रेस्टॉरंटमधून महिलेला अटक करून महिलेकडून कॅमेरा जप्त केला आहे. तपासात आरोपी महिला बऱ्याच दिवसांपासून अशी फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.