AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kranti Redkar : नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना क्रांती रेडकर म्हणाल्या की, तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही खुश राहा आणि आनंदी राहा!

राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचा निर्णय जात प्रमाणपत्र छाननी समितीने दिला आहे.

Kranti Redkar : नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना क्रांती रेडकर म्हणाल्या की, तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही खुश राहा आणि आनंदी राहा!
क्रांती रेडकरImage Credit source: Google
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 13, 2022 | 7:19 PM
Share

मुंबई : एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात आज मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र (Cast Certificate) छाननी समितीकडून क्लीन चीट (Clean Cheat) मिळाली आहे. समितीच्या या निर्णयावर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आनंद व्यक्त करीत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबियांना टोला लगावला आहे. ”तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही खुश राहा आणि आनंदी राहा…” अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिली आहे. सत्याच्या लढ्यासाठी कायदेशीर पुरावा असणे अत्यंत गरजेचे आहे, जो आज आपल्याला मिळाला आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

क्रांती रेडकर यांनी सर्वप्रथम TV9 चे मानले आभार

राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचा निर्णय जात प्रमाणपत्र छाननी समितीने दिला आहे. हा निर्णय वानखेडे यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा तर नवाब मलिक यांना मोठा झटका देणारा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांती रेडकर यांनी आज समितीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मलिक यांना सुनावले आहे. तसेच सर्वप्रथम त्यांनी TV9 चे आभार मानले आहेत.

सत्याच्या लढाईत बळ मिळणार

क्रांती रेडकर म्हणाल्या की, सत्याच्या लढ्यासाठी कायदेशीर पुरावा असणे अत्यंत गरजेचे असते. जो आज जात प्रमाणपत्र छाननी समितीच्या निर्णयामुळे आम्हाला मिळाला आहे. आज आम्हाला सरकारकडून न्याय मिळाला आहे. आमच्यावर मलिक व इतर मंडळींनी लावलेले सर्व खोटे आरोप खोटे ठरवणारा तसेच आम्हाला सत्याच्या लढाईत बळ देणारा महत्वाचे कागदपत्र मिळाले आहे, असेही रेडकर यांनी नमूद केले आहे. याचवेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना टोला लगावला आहे. तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही आनंदी राहा आणि स्थिर राहा, किती लोक कोणत्या थराला गेले होते हे मी सांगू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

आमच्यासाठी ही मोठी लढाई होती!

माझे पती समीर वानखेडे यांचा पाठलाग केला जात होता. काही जण पोलिस म्हणून आमच्या घरी येत होते तर काही जण वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आम्ही सर्वांसमोर येऊ दिल्या नाहीत. आमच्यासाठी ही मोठी लढाई होती. समीर वानखेडे यांच्या देशभक्तीवर, देशप्रेमावर कुणीच कधीच शंका घेऊ शकणार नाही. नवाब मलिक यांनी जे काही आरोप केले, ते सर्व आरोप आज जात प्रमाणपत्र छाननी समितीच्या निर्णयानंतर खोटे ठरले आहेत. कोण खोटे आणि कोण खरे हे आज जनतेसमोर सिद्ध झाले आहे, असेही क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे. (Kranti Redkars reaction after Sameer Wankhede got a clean cheat in the caste certificate case)

Follow Us
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...