AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नात्यांची गुंतागुंत, पोटच्या मुलीशी 57 वर्षीय प्रियकराचं लग्न, मुंबईत सत्तरीच्या महिलेने बॉयफ्रेण्डचा जीव घेतला

70 वर्षीय शांती पाल आणि 57 वर्षीय बिमल खन्ना यांचे प्रेमसंबंध होते. मात्र शांती पाल यांच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलीशी बिमल खन्ना याने लग्ना केल्यामुळे शांती यांचा संताप झाला होता. खन्नाने आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, या भावनेतून शांती पाल यांच्या संतापाचा पारा चढला होता.

नात्यांची गुंतागुंत, पोटच्या मुलीशी 57 वर्षीय प्रियकराचं लग्न, मुंबईत सत्तरीच्या महिलेने बॉयफ्रेण्डचा जीव घेतला
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 19, 2021 | 1:41 PM
Share

मुंबई : 57 वर्षीय प्रियकराचा खून केल्या प्रकरणी मुंबईत 70 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. बुधवारी वडाळ्यातील त्यांच्या राहत्या घरात हे हत्याकांड घडले होते. रागाच्या भरात हातोड्याने वार करुन वृद्धेने प्रियकराचा खून केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

70 वर्षीय शांती पाल आणि 57 वर्षीय बिमल खन्ना यांचे प्रेमसंबंध होते. मात्र शांती पाल यांच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलीशी बिमल खन्ना याने लग्ना केल्यामुळे शांती यांचा संताप झाला होता. खन्नाने आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, या भावनेतून शांती पाल यांच्या संतापाचा पारा चढला होता.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी रात्री उशिरा बिमल खन्ना घरी आला असता त्याचे शांती पाल यांच्याशी भांडण झाले. रागाच्या भरात त्यांनी प्रियकराच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, अशी माहिती वडाळा टीटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली. ब्रेन स्ट्रोकवर औषधोपचार सुरु असलेले खन्ना या हल्ल्यानंतर बेशुद्ध पडले.

35 हून अधिक वर्षांचा सहवास

पोलिसांनी सांगितले की शांती पाल आणि त्यांची मुलगी 1984 च्या दंगलीनंतर पंजाबमधून मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांची भेट बिमल खन्ना यांच्याशी झाली. त्यांनी मायलेकींना आश्रय दिला होता. पाल आणि खन्ना एकत्र राहत होते. या नात्यातून त्यांना एक मुलगीही झाली आहे.

नात्यांचा गुंता

दरम्यान, बिमल खन्ना यांनी शांती पाल यांच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीशी लग्न केले. या नात्यांच्या गुंत्यामुळे शांती पाल भडकल्या होत्या. भांडणानंतर संतापाच्या भरात त्यांनी खन्नांवर हातोड्याने वार केल्याचा आरोप केला जात आहे.

रुग्णालयात खोटी माहिती

बुधवारी शांती पाल यांनी खन्ना यांना सायन रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांना ते घरात कोसळल्याचे सांगितले. मात्र शव विच्छेदनात उघड झाले की खन्ना यांचा मृत्यू पडल्यामुळे, वार किंवा हल्ल्याने झालेल्या शारीरिक आघातामुळे झाला. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी शांती पाल यांना ताब्यात घेतले. अखेर पाल यांनी हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मोबाईल घरी ठेवून दरोडा, कोड नंबरने एकमेकांना हाका, दुहेरी हत्या करणारे पाच दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात कसे सापडले?

विवाहबाह्य संबंधातून अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या, मृतदेहाचे प्रायव्हेट पार्टही पेटवले

लग्नमंडपात नवरदेवाची 19 वर्षीय भाची मृतावस्थेत, मावस भावाकडून बलात्काराच्या प्रयत्नानंतर खून

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज.

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज